नुकतेच केरळमधील वायनाड येथे भूस्खलनाची दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी दुर्घटनेत २००हून अधिक नागरिकांना मृत्यू झाला. तसेच संपूर्ण परिसरात चिखल आणि माती पसरली. या पार्श्वभूमीवर वायनाडचे माजी खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तातडीने यांनी केरळ येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वायनाड येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी १०० घरे बांधून देणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, केरळमध्ये यावेळच्या वायनाडमधील दुर्घटनेइतकी विनाशकारी घटना एका भागात कधीच घडली नाही. मी हा मुद्दा केंद्र आणि राज्य सरकारांसमोर मांडणार आहे, कारण या शोकांतिकेला अनोखे आणि तातडीच्या प्रतिसादाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आमचे तात्काळ लक्ष बचाव, मदत आणि पुनर्वसन या प्रयत्नांवर आहे. काँग्रेस परिवार येथे १०० हून अधिक घरे बांधण्यासाठी कटिबद्ध आहे. या गरजेच्या वेळी आमच्या बंधुभगिनींना शक्य ती सर्व मदत केली जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत असेही यावेळी सांगितले.
Kerala has never witnessed a tragedy in one area as devastating as the one in Wayanad this time. I will raise this issue with both the Union and State Governments, as this tragedy demands a unique and urgent response.
Our immediate focus is on rescue, relief, and rehabilitation… pic.twitter.com/cdF3J5OgYE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 2, 2024