Breaking News

कृषी

शेतमाल तारण कर्ज योजनेत शंभराहून अधिक बाजार समित्या पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ सुरु करण्यात आली. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम आणि अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल …

Read More »

शेतीमाल किंमती आणि बोंडअळी नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे नाहीच राज्य सरकारकडून उत्तर न आल्याने विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्याने गळा काढणाऱ्या भाजप सरकारने शेतीचा दर ठरविण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना केली. मात्र या कृषी आयोगाने राज्यातील शेती मालाचा हमीभाव ठरविण्याचा प्रस्ताव आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग …

Read More »

वीज बील न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार वीज मंत्र्यांच्या उत्तराच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वीजच्या रकमेची थकबाकी आहे. मात्र काही वीज बीलांच्या रकमेत तांत्रिक कारणामुळे अवाच्या सव्वा वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ ते ५ हजार रूपये भरावे असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून जे शेतकरी सांगितलेली रक्कमही भरणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा करणारे रोहीत यंत्र आणि वीज …

Read More »

दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या एसटी वाहतूकीवरील बंदी उठविली परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातून शहरी किंवा तालुक्याच्या ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोहचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून एस.टी बसेसचा वापर केला जात असे. मात्र त्यावर गेल्या महिन्यात एसटी महामंडळाने बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होवू लागल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांवर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकार …

Read More »

विदर्भात दुष्काळ जाहीर करा विरोधकांसह सत्ताधारी बाकावरील आमदारांची मागणी: कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी विदर्भातील ६५ टक्के धान शेतींला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर १० टक्के जमिनीवर पेरणीच झालेली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याने त्या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदीया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर …

Read More »

राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राचे सहकार्य कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांची बैठकीनंतर माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील कापसाच्या शेतीवर बोंड अळीचा रोग झाल्याने मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे कापूस शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक असलेले सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी राज्य सरकारला दिल्याचे माहिती राज्याचे …

Read More »

ऊस वजन काट्यात बनवाबनवी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील काही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना वजन काट्यात बनवाबनवी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात सदर कारखान्याच्या वजन काट्याच्या ठिकाणी भरारी पथकाकडून छापे मारून कारखान्याच्या संचालकांवर कारवाई करणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना काही साखर कारखान्यांकडून त्याच्या वजनात काटा …

Read More »

राज्यातील २२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ६९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यापैकी ४३ लाख १६ हजार ७६८ खात्यांच्या कर्जमाफीसाठी बँकांकडे पैसे पाठविण्यात आले आहे. तर २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झाले असून एकाही शेतकऱ्याचा अर्ज फेटाळला नसून आजही कर्जमाफीसाठी अर्ज आला तर तो मंजूर करण्याची तयारी असल्याची माहीती मुख्यमंत्री …

Read More »

राज्यातील सर्व शेती, शाळा, वसतिगृहांना सौर ऊर्जा पुरविणार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी भविष्यकाळात राज्यात कोळशावर आधारीत वीज शेतीला पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी सोलर यंत्रणेचा वापर करून दिवसाची वीज शेतकऱ्याला पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व शाळांना आणि सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सौर ऊर्जेवरील वीज पुरवठा करण्यात येणार असून शेती, शाळा आणि वसतिगृहांना सौर ऊर्जा …

Read More »

बोंडअळी व तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना मदत तीन वेळा देणार कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे विधानसभेत आश्वासन

नागपूर: प्रतिनिधी मराठवाडा आणि विदर्भातील कापूस उत्पादनावर बोंडअळीचा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या. त्यानुसार अशा शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले असून बोंडअळी बरोबरच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार, बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि विमा कंपन्याकडून मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन …

Read More »