Breaking News

निकाल गुजरातचा मात्र असुरक्षिततेची भावना महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधकांमधील आत्मविश्वास दुणावला

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वंच राज्यामध्ये भाजपच्या अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उधळलेल्या राजकिय वारूला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र गुजरात विधानसभेत भाजप ९९ जागां जिंकत तेथील सत्तेवर चवथ्यांदा स्थानापन्न होणार असली तरी तेथील निसटत्या विजयाने भाजपमधील नेते-कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली असून गुजरातच्या निकालाची …

Read More »

पोलिओ डोस खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करणार अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची माहिती

नागपुर : प्रतिनिधी हाफकीन या देशातील एकमेव कंपनीकडून पोलिओ डोस खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता मुख्य सचिवांच्या अध्यक्षेखाली समिती नियुक्त केली असून सदर समितीचा अहवाल सादर होताच कारवाई करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि औषधी द्रव्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली. विधानसभेत …

Read More »

विदर्भात दुष्काळ जाहीर करा विरोधकांसह सत्ताधारी बाकावरील आमदारांची मागणी: कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी विदर्भातील ६५ टक्के धान शेतींला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर १० टक्के जमिनीवर पेरणीच झालेली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याने त्या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदीया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर …

Read More »

पोषक आहार धान्य खरेदीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार एसआयटी मार्फत चौकशी करण्याची खडसेंची मागणी

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील शाळांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषक आहाराच्या धान्य खरेदीत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी करत याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. विधानसभेत रायगड जिल्ह्यात शालेय पोषण आहार पुरविण्याच्या कामात अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात आल्याचा आरोप चंद्रपूरचे कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अगरवाल …

Read More »

चिरीमिरी दिल्याशिवाय टेंडर मंजूर होत नाही अजित पवारांचा पाणी पुरवठा विभागावर आरोप

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदारांची अडचण होत असल्याने त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की, सारे काही आलबेल सुरु आहे, असे नसून कोणी कितीही नाही म्हणटले तरी पाणी पुरवठा विभागात चिरीमिरी दिल्याशि‌वाय टेंडरच मंजूर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला. विधानसभेत …

Read More »

राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राचे सहकार्य कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांची बैठकीनंतर माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील कापसाच्या शेतीवर बोंड अळीचा रोग झाल्याने मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे कापूस शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक असलेले सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी राज्य सरकारला दिल्याचे माहिती राज्याचे …

Read More »

घोटाळेबाजांना शासन होईपर्यंत काँग्रेसकडून पाठपुरावा सुरुच ठेवणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच चिक्की घोटाळा प्रकरणात क्लीनचीट दिली. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार हे ‘क्लीन-चीटर’ सरकार असून चिक्की खरोदीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्या विरोधात तक्रार केली. त्यांच्याच कडून लाचलुचपत विभागाने अभिप्राय घेत चोराच्या साक्षीवर  मंत्र्याला क्लीन चीट दिल्याचा …

Read More »

संदिप कुलकर्णी बनणार तानाजी डांगे

मुंबई : प्रतिनिधी काही कलाकारांच्या उपस्थितीमुळेच चित्रपटाभोवती एक अनोखं वलय निर्माण होत असतं. प्रचंड मेहनतीने त्यांनी आजवर पडद्यावर सजीव केलेल्या व्यक्तिरेखांनी दिलेली ती जणू पोचपावतीच असते. त्यामुळेच अशा कलाकारांपुढे इतर सर्व गोष्टी दुय्यम मानत रसिक मायबापही त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे धाव घेत असतात. हिंदीसोबतच मराठी तसंच इतर भाषिक चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीवर …

Read More »

एससी-एसटीचा अखर्चीक विकास निधी राखीव ठेवण्याचा कायदा करा शिवसेना, काँग्रेसच्या मागासवर्गीय आमदारांची मागणी तर भाजपाच्या आमदारांची पाठ

नागपुर : संजय बोपेगांवकर राज्यातील अनुसूचित जाती-जमाती आणि आदीवासी यांच्या विकासाकरीता विविध योजना सरकारकडून राबविण्यात येतात. या योजनांच्या अंलबाजवणीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात असलेला विकासनिधी राज्यकर्त्ये इतर कामाकरीता पळवापळवी करत असल्याने मागास व आदीवासी समाजाची विकास कामे ऱखडली जात असल्याने भारतीय नियोजन आयोगाच्या अपेक्षा प्रमाणे अखर्चीक निधी आंध्र व कर्नाटक सरकारप्रमाणे राखून ठेवण्यासाठी …

Read More »

केंद्र सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांचे ९०० कोटी थकवले आमदार प्रकाश गजभिये यांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी केंद्र सरकार कडून इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारणासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र भाजप सरकार राज्यात व केंद्रात सत्तेत आल्यापासून ते बंद असून दोन वर्षातील शिष्यवृत्तीचे ९०० कोटी रूपये या सरकारने थकविले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. विधान परिषदेत त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ओबीसी …

Read More »