Breaking News

हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब? राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवारांच्या नावाऐवजी सुप्रियांच्या नावावर एकमत

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नासह विविध प्रश्नी राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाच्या निमित्ताने राज्यातील पक्षाला हवे असलेले नवे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्या रूपाने स्थापित करण्याचा प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर सत्तेत असताना सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी …

Read More »

कर्जमाफीच्या प्रश्नावरून विधिमंडळात गदारोळ विरोधकांच्या गोंधळानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित

नागपूर : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होते. सभागृहाचं सुरू होताच विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वाढत्या गदारोळामुळे सभागृह चालविणे अशक्य झाल्याने विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. पुढेही असाच तर गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात …

Read More »

‘बाप माणूस’ बनून येताहेत रवींद्र मंकणी

मुंबई: प्रतिनिधी आजही रवींद्र मंकणी हे नाव उच्चारताच चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये धीरगंभीर भूमिका प्रचंड ताकदीने साकारणारे दमदार अभिनेते ही छबी अनाहुतपणे डोळ्यांसमोर उभी राहते. एखादी मालिका, चित्रपट किंवा नाटक स्वीकारताना चाेखंदळपणे कथानक आणि व्यक्तिरेखेची निवड करण्याच्या सवयीमुळेच मंकणी यांनी आजवर साकारलेल्या सर्वच भूमिका रसिकांच्या मनात घर करणाऱ्या ठरल्या. याच …

Read More »

खासदार प्रफुल्ल पटेल यांचा सल्ला राष्ट्रवादीतील कोणाला? मन मोठी करून कामे करा परिवर्तन होईलच

नागपूर : प्रतिनिधी राज्यात सत्तास्थानी येवून या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. मात्र सरकारच्या कारभारामुळे देशातील शेतकरी हवालदील झाल्याची सरकारवर टीका करत असतानाच मध्येच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडे पहात जरा मन मोठी करून कामे करा परिवर्तन होईलच असा सल्ला राष्ट्रवादीतील नेत्यांना देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भर सभेतच …

Read More »

मदत न करणाऱ्या सरकारची कोणतीही बीले भरू नका जनआक्रोश मोर्चाच्या सभेत शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन

नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव देण्याची घोषणा देत सत्तेवर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी तातडीने मदत करावीशी वाटत नाही. कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही त्यांच्याकडून अद्याप कर्जमाफी दिलेली नाही. यांच्या हृदयाला पाझर कसा …

Read More »

राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांच्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे), सपा, माकप सहभागी

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक महत्वाच्या प्रश्नावर कॉंग्रस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाची सुरुवात नागपूर येथील दिक्षाभूमीवरून सुरुवात झाली. या मोर्चामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते सहभागी झाले होते. या मोर्चात शेकाप, आरपीआय (कवाडे) गट, समाजवादी …

Read More »

आजच्या परिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार सिंचनापासून सर्व घोटाळे सभागृहात मांडण्याचा मुख्यमंत्र्याचा गर्भित इशारा

नागपूर : प्रतिनिधी हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत कर्जमाफीतील घोटाळे जनतेसमोर आणण्याचे आव्हान दिले. विरोधकांच्या या आव्हानाची तात्काळ दखल घेत हल्लाबोल करणार्‍यांच्या डल्लामार यात्रेचे सविस्तर पुरावेच सभागृहात सादर करणार असून राज्याच्या सद्यपरिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार आहेत. त्यामुळे ते सत्तेत …

Read More »

बीजेपी-शिवसेनेच्या रूपाने राज्याला बोंडअळी आणि तुडतुड्याची लागण विरोधी पक्षांची राज्य सरकारवर टीका

नागपूर : प्रतिनिधी राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार येवून तीन वर्षे झाली. मात्र या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्राला उध्दवस्त करण्याचे काम केले असून या सरकारचे लाभार्थी हेच आहेत. सरकारच्या रूपाने महाराष्ट्राला बोंडअळी अन् तुडतुड्याची लागण झाली आहे. ‘बी फॉर बोंडअळी अन् बी फॉर बीजेपी’… ‘टी फॉर तुडतुडा अन् टी फॉर ठाकरे’ अशी टीका …

Read More »

गृहनिर्माण मंत्र्यांच्या चौकशीची माहिती द्या सामान्य प्रशासन विभागाचा गृहनिर्माण विभागाला अजब आदेश

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच अनेक आमदारांकडून राज्य सरकारच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. मात्र मुंबईतील ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊडमधील प्रकल्पाला मंजूरी प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता हे संशयाच्या भोवऱ्यात असल्याने त्यांची चौकशी लोकायुक्तामार्फत झाली का नाही याची माहिती गृहनिर्माण विभागानेच द्यावी असा अजब आदेश राज्याच्या …

Read More »

विरोधकांचा १२ डिसेंबरला विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नेतृत्व करणार

नागपूर : प्रतिनिधी सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली १२ डिसेंबर २०१७ रोजी विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई (कवाडे) आदी सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री …

Read More »