Breaking News

मंत्रालयाच्या दारात आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न ग्रामस्थांने अंगावर रॉकेल ओतून घेतले

मुंबई : प्रतिनिधी अन्यायाच्या विरोधात किंवा स्वत:चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात येवून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मागील महिनाभरात हे सत्र थांबले असे वाटत असतानाच  लासलगावच्या गुलाब शिंगारी यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा  प्रयत्न केला. मात्र  पोलिसांनी प्रसंगाचे गंभीर्य ओळखून शिंगारी यांना ताब्यात घेतले. …

Read More »

विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात विरोधकांची राज्यपालांकडे तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या सदस्यांनी घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून विरोधी बाकावरील सदस्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणलेला असताना तो ठराव चर्चेला न घेता राज्य सरकारकडून त्यांच्यावर विश्वास दाखविणारा ठराव मांडत लोकशाही मुल्याची मोडतोड केल्याची तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आमदारांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेत केली. यावेळी काँग्रेसचे …

Read More »

विजय कदमांच्या ‘खुमखुमी’ने सर केली चेन्नई तामीळनाडूतही मराठी नाटकाची सोडली छाप

मुंबई : प्रतिनिधी विजय कदम हे नाव आठवताच सहजसुंदर अभिनय करणारा एक हसऱ्या कलाकाराचा चेहरा अनाहुतपणे समोर येतो. अलिकडच्या काळात कदम चित्रपटांपासून थोडे दूर गेले असले तरी रंगभूमीवर मात्र सक्रियपणे कार्य करीत आहेत. आजही त्यांच्या गाजलेल्या नाटकांच्या तसेच कार्यक्रमांच्या आठवणी नाट्यरसिकांच्या मनात ताज्या आहेत. यापैकीच एक असणाऱ्या ‘खुमखुमी’ची यशस्वी चौफेर …

Read More »

हत्तींचं संरक्षण म्हणजे पुण्यकर्म गायिका कनिका कपूरचे मत

मुंबई : प्रतिनिधी अलिकडच्या काळात सेलिब्रिटीजचा उपयोग जनजागृतीसाठी करून जनमानसांच्या मनामध्ये समाजहितोपयोगी भावना जागृत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. याचे चांगले परिणामही दिसत आहेत. पर्यटनापासून प्रदूषण मुक्तीपर्यंत बऱ्याच आघाड्यांवर आघाडीच्या विविध सेलिब्रिटीज जनजागृती करण्याचं काम करीत आहेत. अशा सेलिब्रिटीजच्या पंक्तीत गायिका कनिका कपूरही विराजमान झाली आहे. हत्ती वाचवण्याच्या मोहिमेत …

Read More »

अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने सरकारकडून लोकशाहीचा खून विरोधकांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत कामकाजाच्यावेळी अनेकदा मंत्री नसतात, प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. उत्तरे प्राप्त होत नाहीत. मंत्री नसल्याने उत्तरे, प्रश्न, लक्षवेधी पुढे ढकलायची पध्दत सर्रास सुरु होती. एककल्लीपणाने सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी करत केवळ या कारणामुळे …

Read More »

राज्य सरकारने विरोधकांचे तोंड दाबले अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठरावावर विरोधकांना बोलण्याची संधी नाकारली

मुंबई: प्रतिनिधी विधानसभेत विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास दर्शक ठराव संमत केल्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह मंत्र्यांनी विरोधकांना बोलूच न देण्याची भूमिका घेतल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांचे तोंड दाबल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अध्यक्षांवरील ठराव मंजूर करण्यात …

Read More »

चलाखीने अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव दोन मिनिटांत मंजूर राज्य सरकारची विरोधकांवर कुरघोडी

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हेतूपुरस्सर वागत आणि पक्षपाती पध्दतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. मात्र विरोधकांचा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांवरील ठराव मांडत आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करत गाफील विरोधकांवर राजकीय कुरघोडी …

Read More »

मुंबई शहर, उपनगर तसेच ठाण्यात एसआरएसाठी सीईओ नेमणार गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरातील एसआरएच्या योजनांना अधिक गती देण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील एसआरए योजनांची वाढती व्याप्ती लक्षात घेता या तिन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ची नेमणुक करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले. विधानसभा परिषद …

Read More »

कडधान्याला भाव मिळत नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक विधान परिषदेचे कामकाज तहकूब : शेतकऱ्यांना अजून किती नागवणार ? तटकरे यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी शेतक-यांच्या तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर अभूतपूर्व कोसळले असल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडत कडधान्याच्या पिकाच्या बाबतीतील शासनाचे चुकीचे हमीभाव धोरण,  सरकारची  उदासीनता यामुळे हे भाव  कोसळले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान तुर, सोयाबीन, उडीद दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने …

Read More »

अखेर सारानेच मारली बाजी सारा बनली सिम्बागर्ल

मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ महिनाभरापूर्वी ‘कोण बनणार रणवीरची नायिका?’ या मथळ्याखाली आम्ही एक बातमी दिली होती. यात रणवीर सिंहची नायिका कोण बनणार आणि या शर्ययीत कोणत्या अभिनेत्री आहेत याबाबत सांगितलं होतं. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’नंतर झोया अख्तरच्या ‘गल्ली बॅाय’या सिनेमामुळे रणवीर सध्या चर्चेत आहे. असं असलं तरी रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली …

Read More »