मुंबई : प्रतिनिधी लाँग मार्चमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. सरकारने त्यांची तातडीने दखल घेऊन ठोस भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा हा असंतोष, हा ज्वालामुखी, सरकारला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला. सोमवारी विधानसभेत कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी हजारो आदिवासी …
Read More »“किशोर से कुमार्स तक” किशोर कुमार यांच्या चाहत्यांसाठी संगीत मेजवानी
मुंबई : प्रतिनिधी रंगभूमीवरील नाट्यकलाकृतींसोबत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण कारण्यात वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा) यशस्वी ठरला आहे. आपले वेगळेपण सिध्द करण्यासाठी येणाऱ्या अडचणीसोबत संघर्ष करीत आपला ठसा उमटवीत यशस्वी होत प्रचंड लोकप्रियता मिळविली. लोकप्रिय गीतकार, संगीतकार, गायकांनी निर्माण केलेल्या अवीटगोडीच्या अजरामर लोकप्रिय गाण्यांवर सादर होणाऱ्या या कलाप्रकारात विविध बदल करुन सादर केलेल्या …
Read More »मोर्चेकऱ्यांसाठी अशीही सेवा… सोलार पँनलच्या माध्यमातून मोबाईल चार्जींगची सुविधा
मुंबई : बी.निलेश शेतकरी, आदीवासी आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या न्याय मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई दरम्यान अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकरी लाँग मार्च काढला. मात्र या मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्तींचा मोबाईल फोन डिसार्च होवून त्यांचा कुटुंबियांशी संपर्क तुटू नये याउद्देशाने नथू निवृत्ती उदार या शेतकऱ्याने एक ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले. विशेष म्हणजे …
Read More »अखेर काँग्रेसच्या खासदारकीची माळ ज्येष्ठ पत्रकार केतकरांच्या गळ्यात शिंदे, शुक्ला, महाजनांच्या नावावर राहुल गांधी यांनी मारली काट
मुंबई : प्रतिनिधी अखेर मुंबईतून राज्यसभेवर जावू इच्छिणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे आणि रत्नाकर महाजन यांच्या नावावर काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी फूली मारत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना मुंबईतून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा पत्रकारतेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे …
Read More »सरकारशी चर्चा सकाळीच… मुंबईकरांना त्रास होवू नये म्हणून मोर्चा रात्रीतच आझाद मैदानावर पोहोचणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, आदीवासी यासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर किसान सभेने जरी मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचा त्रास मुंबईच्या चाकरमान्यांना होवू नये यासाठी रात्री १२ नंतर सोमय्या मैदानावरून आझाद मैदानाकडे निघणार असून रात्रीत सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ.अशोक ढवळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना विना …
Read More »मुनगंटीवार, बापट, फुंडकर, सवरांना मुख्यमंत्र्यांनी बोलाविले मोर्चेकऱ्यांच्या प्रश्नी चर्चा करण्यासाठी तातडीने हजर राहण्याचे मंत्र्यांना आदेश
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांसह, आदीवासी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नी किसान सभेने काढलेल्या लाँग मार्चची राज्य सरकारने उशीराने का होईना दखल घेत त्यांच्या मागण्याप्रमाणे तोडगा काढण्यासाठी संबधित मंत्र्यांना तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविले आहे. या मंत्र्यामध्ये अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, कृषी मंत्री …
Read More »आणि शिवसेनेचे आदरातिथ्य मोर्चेकऱ्यांनी नाकारले पाणी स्विकारू पण इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टी नाही
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर प्रश्नांवर किसान सभेने नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला. शेतकऱ्यांच्या मोर्चा असल्याने शिवसेनेने पुढाकार घेत मोर्चेकऱ्यांचे स्वागत करत पिण्याच्या पाण्यासह खाण्या-पिण्याच्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. मात्र शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल घेतलीत म्हणून तुमचे पाणी स्विकारू पण खाण्याच्या-पिण्याच्या गोष्टी स्विकारणार नसल्याचे सांगत शिवसेनेचे आदारातिथ्य नाकारल्याची माहिती …
Read More »शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेस, राष्ट्रवादीचाही किसान सभेच्या मोर्चाला पाठिंबा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे होणार सहभागी, विखे-पाटीलही सहभागी होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी मोर्चा डाव्यांच्या किसान सभेने काढलेल्या मोर्चाला आता शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सहभागी होणार असल्याची …
Read More »शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दोन कट्टर राजकिय शत्रू एकत्र भाजप विरोधासाठी शिवसेनेची आंबेडकरवाद्यांपाठोपाठ आता डाव्यांना मदत
मुंबई : प्रतिनिधी एकेकाळी मुंबईतील लाल बावटा अर्थात डाव्यांचा राजकिय वरचष्मा संपविण्यासाठी शिवसेनेने जंगजंग पछाडले. त्यात त्यांना चांगल्यापैकी यशही मिळाले. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात नेहमीच विळ्या भोपळ्याचे नाते शिवसेना आणि डावे यांच्यात राहीले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आणि भाजप विरोधासाठी लाल बावट्याच्या साथीला आता शिवसेनाही धावली असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. …
Read More »काँग्रेसच्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात ? राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे कि रत्नाकर महाजन
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या ६ जागांकरीता निवडणूक होत असून या निवडणूकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून तीन नावे अंतिम करण्यात आलेली आहेत. या तीन नावांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यातील कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार याचा निर्णय दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष …
Read More »