Breaking News

दुषित भाज्यांची विक्री रोखण्यासाठी शेतकरी केंद्रे सुरू महापालिकेला केंद्रे सुरु करण्याबाबत सूचना करण्याचे नगरविकास राज्यमंत्र्याचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी शहरातील अनधिकृत फेरिवाल्यांद्वारे दुषित भाज्यांची विक्री केली जात असल्याप्रकरणी सांताक्रुज येथील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुषित भाज्यांच्या विक्रीला चाप बसून नागरिकांना चांगल्या दर्जाची भाजी मिळावी यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या सुचनेनुसार शेतकरी केंद्रे सुरू करण्याच्या सुचना मुंबई महापालिकेला केली जाणार असल्याचे आश्वासनही नगरविकास राज्यमंत्री …

Read More »

सुरुवात तुम्ही केलीय मात्र शेवट आम्ही करणार घोटाळ्याची रोज एक सीडी बाहेर काढणार असल्याची धनंजय मुंडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी एका दूरचित्रवाहीनीवर विधिमंडळात प्रश्न न लावण्यासंदर्भात मला पैसे दिल्याचा वृत दाखविण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भात मुंबईतील शासकिय निवासस्थानी असूनही कोणी याबाबत संपर्क  केला नसल्याचे दु:ख असल्याचे सांगत या सभाग्रुहात मी प्रत्येक मंत्र्यांना अडचणीत आणल्याने त्याचा मनात राग धरूनमाझ्यावर हे आरोप केले गेले आहेत. तुम्ही हजार अग्नीपरीक्षा घ्या …

Read More »

नाना पाटेकरच्या मराठी चित्रपटाचा हिंदीत रिमेक सैराट नंतर ‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेक : करीना करणार काम

मुंबई : प्रतिनिधी हिंदी सिनेसृष्टीत सध्या प्रादेषिक भाषेतील चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. यात मराठीचाही झेंडा मोठ्या डौलाने फडकताना दिसतोय. बॅालिवुडमधील ख्यातनाम निर्माता-दिग्दर्शक अशी ओळख असलेला करण जोहर ‘सैराट’च्या प्रेमात पडला आणि तो ‘धडक’ शीर्षकाने या चित्रपटाचा रिमेक बनवतोय. या मागोमाग नुकताच प्रदर्शित झालेल्या सतिश राजवाडे दिग्दर्शित आणि …

Read More »

गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वाटोळे करायचे का ? २५ टक्के कोट्यातून खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याचा शिवसेनेसह विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी खाजगी शाळांमध्ये गरबी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी केंद्र  सरकारने २५ टक्के आरटीई अंतर्गत आरक्षित कोटा दिला. तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधकांनी करत विधानसभेत संताप व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसेल तर सरकारने आतापर्यंत काय केले? राज्यातील गोर-गरिबांच्या मुलांचे वाटोळे करायचे आहे का? असा प्रश्न …

Read More »

परिचारक आणि मुंडेच्या निलंबनावरून शिवसेना- भाजप आमने-सामने शिवसेनेला भाजपकडून घरचा आहेर

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीवरून भाजपने विधानसभा डोक्यावर घेतले. मात्र त्यांच्या मागणीला शिवसेनेने प्रतित्तुर देत भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक यांचे मागे घेण्यात आलेले निलंबन रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने करत सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर …

Read More »

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाची न्यायालयीन चौकशी करा अजित पवार यांनी मागणी करत भाजपवर केला पलटवार

मुंबई : प्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे यासंदर्भातील ऑडिओ क्लीप विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी ऐकावी आणि गरज पडल्यास त्यांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते …

Read More »

सरकारच्या फसवणूकीच्या गर्तेतून जनतेला बाहेर काढायला हवे हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि कोटयावधी रुपये खर्च करुन जनतेला फसवायचे अशा फसवणूकीच्या गर्तेत अडकलेल्या जनतेला वाचवायचे असेल तर सर्वांची सामुहिक शक्ती एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि तरच राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील हल्लाबोलच्या जाहीर …

Read More »

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे समोर सरकार हतबल भीमा कोरेगांवप्रकरणी विधान परिषदेत चर्चेची मागणीने गोंधळ : परिषद दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : प्रतिनिधी संभाजी भिडे, मिलींद एकबोटे या दोन व्यक्तींपुढे भारतीय जनता पार्टीचे सरकार हतबल झाल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी करत भीमा कोरेगांव येथील दंगल ही सरकार पुरस्कृत दंगल असल्याचा  आरोप करत या दिवसभराचे कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी केली. विधान परिषदेचे सकाळी …

Read More »

आणि भाजप आमदारांच्या आक्रमणाला आरोग्यमंत्र्यांकडून मोदींच्या नावाचे उत्तर क्षयरोगाच्या संशोधनासाठी जे.जे.रूग्णालयात केंद्र सुरु करण्याची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात क्षयरोगग्रस्तांची संख्या वाढत असून या रोगावरील उपचार सेवेवरून भाजप आमदार पराग अळवणी, अतुल भातखळकर यांनी चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी भाजप आमदारांच्या विरोधाची धार बोथट करून टाकल्याचे दृष्य …

Read More »

४८ तास उलटून गेल्यानंतर आता मराठी अनुवादप्रकरणी चौकशीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला आश्वासन देवूनही अंमलबजावणी नाहीच

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या अभिभाषणाचा अनुवाद मराठीत वाचून न दाखविल्याने सभागृहाचा हक्कभंग झाला. याप्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत सभागृहाची माफी मागत संध्याकाळपर्यंत संबधित व्यक्तीला घरी पाठविण्याची घोषणा केली. त्यास ४८ तास उलटून गेले तरी संबधित अधिकारी-कर्मचारी अद्याप घरी तर …

Read More »