Breaking News

ओखी वादळग्रस्तांना पंचनाम्यानंतर मदत देणार मदत जाहीर करण्यास सरकारची चालढकल

नागपूर : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा, काजू आणि मच्छिमार उत्पादकांचे नुकसान झाले. या वादळग्रस्तांना राष्ट्रीय आप्तकालीन परिस्थिती अर्थात एनडीआरएफमध्ये येत नसल्याने या विभागातून नुकसान भरपाई देता येणार नाही. मात्र पंचनामे करून एसडीआरएफ अर्थात राज्य आपतकालीन परिस्थितीतून नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगत नेमकी किती नुकसान भरपाई देणार …

Read More »

बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करणार आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचे आश्वासन

नागपुर : प्रतिनिधी नाशिक व गोरखपुर या दोन्ही धटना परस्पर विरोधी आहेत. गोरखपुरची घटना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाली. तर नाशिक मधील घटना काही त्या शहरातली नाही. ठाणे, पालघर, धुळे या आदीवासी पट्ट्य़ातील कुपोषित बालके उपचारार्थ नाशिकमध्ये येतात. यामध्ये जन्मता मृत्यू किंवा जन्मा अगोदर मृत्यू दरामध्येही फरक आहे. वातावरणातील फरक याला कारणीभूत …

Read More »

वांद्रे येथील शासकिय घरे मालकी हक्काने देण्याबाबत सरकारकडून चालढकल मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्याचे सा.बां.मंत्री पाटील यांचे उत्तर

नागपुर : प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे येथील शासकिय वसाहतीतील घरे सरकारी कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने देण्याबाबत मी व्यक्तीश: सकारात्मक आहे. मात्र हा निर्णय मोठा असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतरच याविषयी अधिक बोलणे योग्य होणार असल्याचे गोलमाल उत्तर सार्वजनिक बांधकांम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोडकळीस …

Read More »

राज्यातील शैक्षणिक क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारीत विधेयक विधानसभेत मंजूर

नागपूर: प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार कार्पोरेट क्षेत्रातील किंवा खाजगी कंपन्यांना त्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सोशल रिस्पॉन्सबिलीटी फंड) खर्च करण्यासाठी शाळा स्थापन करण्याची मुभा राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या खाजगी कंपन्यांना शैक्षणिक संस्था सुरु करणे सोयीचे व्हावे यासाठी स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) या कायद्यात …

Read More »

ब्रेकनंतर सोशल मीडियावर राणी हिचकीद्वारे पुनरागमन करणार

मुंबई: प्रतिनिधी फेसबुक, व्हॉट्सअप तसंच ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाने आज सर्वानाच झपाटलं आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सर्वजण आज या मोहजालात अडकले आहेत, पण काही कलाकारांनी मात्र अद्याप या विश्वात डोकावण्याचं धाडस केलेलं नाही. बाळंतपणासाठी ब्रेक घेतलेल्या राणी मुखर्जीनेही आजवर या विश्वापासून दूरच राहणं पसंत केलं होतं. आदिराच्या जन्मानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या …

Read More »

जय मल्हार’नंतर देवदत्तचा ‘चेंबूर नाका’ एका दमदार भूमिकेत दिसणार देवदत्त

मुंबई : प्रतिनिधी काही कलाकार केलेल्या कामांमुळे ओळखले जातात. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचा ठसा रसिकांच्या मनावर असा काही उमटतो की, प्रेक्षक त्यांना पुन: पुन्हा नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुरतात. झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडेरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता देवदत्त नागे यांनी प्रेक्षकांवर अशी काही जादू केली की, अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे …

Read More »

मन्सूर सिद्दीकींचा मराठी सिनेमा ‘राधे मुरारी’

मुंबई: प्रतिनिधी आज जागतिक पातळीवर मराठी सिनेमांचा उदो, उदो होत आहे. केवळ हिंदीतीलच नव्हे, तर इतर प्रादेषिक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची पावलेही मराठीकडे वळू लागली आहेत. मन्सूर अहमद सिद्दीकी हे एक बॉलीवुडमधील एक मोठे नाव. ‘साजन चले ससुराल’, ‘रंग’, ‘ताकत’, ‘दिल ने फिर याद किया’ या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करणारे मन्सूर सिद्दीकीही …

Read More »

एव्हेरग्रीन स्माईलवाली रेणूका नव्या रूपात दिसणार

मुंबई : प्रतिनिधी काही कलाकार नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिकांच्या शोधात असतात. मराठीसोबतच हिंदीतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या काही मराठी कलाकारांचाही यात समावेश आहे. मोजके आणि निवडक चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या रेणुका शहाणे या मराठमोळ्या गुणी अभिनेत्रीचाही समावेश या कलाकारांच्या यादीत आहे. राजश्री प्रोडक्शनच्या ‘हम आपके है कौन’ या गाजलेल्या चित्रपटात सलमान खानच्या …

Read More »

हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन नागपूरात ? अंतिम निर्णय चर्चेअंती घेणार असल्याचे सां. कार्यमंत्री बापट यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशन साधारणत: तीन ते चार आठवड्याचे असते. त्यामुळे या कालावधीत सर्वच बाबींवर सविस्तर चर्चा करता येणे शक्य असल्याने नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्याऐवजी पावसाळी अधिवेशन घेण्याबाबतचा एक नवा प्रस्ताव पुढे आला असून याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी पत्रकारांशी …

Read More »

शेतकऱ्यांच्या फसवणूकीबद्दल सरकारवर गु्न्हा दाखल करा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-२०१७ या कर्जमाफीच्या योजनेत मोठ्या प्रमाणावर बनावट नावे आहेत. यासंदर्भातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला आहे. मुख्यमंत्र्याकडून एकाबाजूला बँकांची नावे घेतली जात असताना दुसऱ्याबाजूला माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवाची बदली सरकारकडून केल्याने या संपूर्ण कर्जमाफी …

Read More »