साधारणत: वर्षभरापूर्वी प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली जीप ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी मुंबई पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेवरून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर आता थेट उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. …
Read More »शेअर बाजाराचे बिग बुल झुनझुनवाला यांनी अखेरचा घेतला निरोप; काय आहे पार्श्वभूमी? वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारतीय शेअर बाजार आणि गुतंवणूक क्षेत्रातील बडे प्रस्थ तसेच शेअर मार्केटमध्ये बिग बुल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी रूग्णालयात सकाळी दाखल करण्यात आले होते. तेथेच सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन; जीएसटी, प्लास्टिक बंदी, एपीएमसी कायद्याचे प्रश्न सोडविणार राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न
राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यापार महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राच्या विकासात व्यापार क्षेत्राचा …
Read More »मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय
केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने युएसएसडी अर्थात असंरचित पूरक सेवा डेटा आधारित मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवा पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे भारत राजपत्र ७ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. यापूर्वी मोबाईल …
Read More »अन्नधान्यावरील जीएसटी रद्द न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार महाराष्ट्र चेंबरच्या बंदच्या आवाहनाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद
केंद्र सरकारने जीवनावश्यक असलेल्या खुल्या (अनपॅक्ड) अन्नधान्य, खाद्यान्नावर अतिरिक्त ५ टक्के जीएसटी कर लावण्याची घोषणा केली. या निर्णयाच्या विरोधात आज देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार उपसत बाजार बंद ठेवला. तसेच केंद्र सरकारने या निर्णय रद्द नाही केला तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. देशात आज …
Read More »रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर दास म्हणाले, दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होण्याचा अंदाज कौटील्य इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना केले स्पष्ट
देशातील जीवनाश्यक वस्तूंसह सर्वच गोष्टीत मोठ्या प्रमाणावर किंमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना महागाईचे चटके बसत आहेत. त्यातच अनेक नागरीकांकडून महागाईचा सामना करण्यासाठी स्वत:च्याच खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात केल्याची बाब पुढे येत आहेत. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या सहामाहीत महागाईं हळूहळू कमी होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी आज व्यक्त …
Read More »२००० ची नोट गेली कुठे? रिझर्व्ह बँक म्हणते गायब झाल्या तब्बल १२.६० टक्के नोटा झाल्या गायब
देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली देशात नोटबंदी जाहीर केली. तसेच चलनातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद केल्या. या नोटबंदीत ५०० ची आणि २००० रूपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणल्या. नोटबंदीचा फटका अनेक सर्वसामान्य व्यक्तींना बसला. परंतु तरीही नागरीकांनी नव्या नोटेचे स्वागत …
Read More »घाऊक महागाईच्या दराने गाठला विक्रमी टप्पा मागील दहा वर्षांतील सर्वाधिक
कोरोना कालावधीनंतर सातत्याने देशात महागाई सातत्याने वाढत आहे. बाजारात पेट्रोल, डिझेल आणि गँसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असतानाच आता जीवनाश्वक वस्तुंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे काही वस्तुंचे भाव वाढलेले आहेत. तर काही वस्तुंच्या किंमती आहे तितक्याच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्याच्या आकारमानात वजनात कंपन्यांनी घट केली आहे. …
Read More »देशातील पहिले ”मधाचे गाव” प्रकल्पाचा ”मांघर” गावी शुभारंभ राज्यातील इतर जिल्ह्यात मधाचे गाव प्रकल्प राबविण्यात येईल-मंत्री सुभाष देसाई
मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून मंत्री देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व …
Read More »आरबीआयने निश्चित केलेला दराचा टप्पा महागाईने ओलांडला खाद्य तेल, खाद्य महागाई आणि किरकोळ महागाई दर आतापर्यंतचा सर्वाधिक
कोरोनानंतर पेट्रोल-डिजेल आणि गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत करण्यात येत असल्याने त्याचा परिणाम जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला, साबण, खाद्य पदार्थ, खाद्य तेल आदींच्या किंमतीतही वाढ होत असल्याने संपूर्ण देशभरातील जनता महागाईने चांगलीच होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्धारीत केलेल्या महागाईच्या दराचा टप्पाही ओलांडला गेला आहे. …
Read More »