मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी तितकासा आशादायक नाही असं म्हणावं लागेल. परंतु त्याच बरोबर केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे व शेती क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा अप्रत्यक्षपणे व्यापार उद्योगाला …
Read More »मोदींचे डिलीट केलेले “ते” ट्विट आणि अर्थमंत्र्यांची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केली डिजीटल करन्सीचा स्विकारण्याचा निर्णय
मराठी ई-बातम्या टीम काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भल्या सकाळी ट्विट करण्यात आले. आणि ते ट्विट बघता बघता संपूर्ण भारतासह जगभरात व्हायरल झाले. मात्र त्यावरून उमटणाऱ्या संभावित टीका-टिपण्णीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी गोची पाहून अखेर ते डिलीट करण्यात आले. तरीही त्याचे स्क्रिन शॉट्स व्हायरल झालेच. त्यानंतर पंतप्रधान …
Read More »अर्थसंकल्प सादर: कोणत्या नव्या घोषणा केल्या अर्थसंकल्पातून ? वाचा ९ टक्के जीडीपी वाढीचा दिड तासात देशाचा अर्थसंकल्प सादर
मराठी ई-बातम्या टीम देशाचा २०२२-२३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर करत देशाच्या विकासाच्या आणि उद्योगवाढीच्या दृष्टीने धोरण काय असेल याचे धोरण अर्थसंकल्पात सादर करण्यात आले. डिजीटल अर्थव्यवस्था आणि क्रिप्टो करन्सी जगातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढण्याचा अंदाज असून इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक …
Read More »अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात: आर्थिक वाढ ८ टक्क्याहून अधिक- अर्थमंत्री उद्या होणार देशाचा अर्थसंकल्प सादर
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर लोकसभेत केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीथारामण यांनी २०२२-२३ चा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल मांडला. हा अहवाल लोकसभेत मांडताना भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज असल्याचे सांगत हा अर्थवाढीचा वेग ९ टक्क्यांपर्यंत …
Read More »२८ दिवसांत जगातील ५०० श्रीमंतांच्या संपत्तीत ४७.६२ लाख कोटींची घट शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम
मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्ष जगभरातील ५०० श्रीमंतांसाठी धक्कादायक ठरले आहे. जानेवारीच्या २८ दिवसांत त्यांची मालमत्ता ४७.६२ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ५८२ लाख कोटींवर आली आहे. 3 जानेवारीपर्यंत ही मालमत्ता ६३० लाख कोटी रुपये होती. मालमत्ता घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता. ३ जानेवारीपासून जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड …
Read More »टाटांनी एअर इंडियाचा ताबा घेतला, एअर इंडियाची ६९ वर्षांनंतर घरवापसी हस्तांतरणापूर्वी चेअरमन चंद्रशेखरन यांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री सीथारामन यांची भेट
मराठी ई-बातम्या टीम देशातील १.२ लाख कोटी रुपयांच्या विमान उद्योगात यावर्षी मोठा बदल झाला आहे. सरकारी कंपनी एअर इंडिया २७ जानेवारी २०२२ पासून खाजगी झाली आहे. टाटा सन्सने अधिकृतपणे एअर इंडिया ताब्यात घेतली आहे. यानंतर टाटा देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी बनली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एअर इंडिया हस्तांतरित …
Read More »मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायनन्सच्या शेअर्स किंमतीत घट आल्याने बसला फटका
मराठी ई-बातम्या टीम गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण असून, त्यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. त्यामुळे मुकेश अंबानींच्या कमाईत मोठी घसरण झाली. परिणामी २५ जानेवारी रोजी गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत त्यांना मागे टाकले. आता अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ …
Read More »या गोष्टींमुळे पेट्रोल, डिझेल किंमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता कच्च्या तेलाने ७ वर्षांचा उच्चांक गाठला
मराठी ई-बातम्या टीम वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसू शकतो. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने ७ वर्षांच्या उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८७ डॉलरच्या पुढे पोहोचली आहे. यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ८७ डॉलरच्या वर गेली होती. १ डिसेंबर २०२१ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ६८.८७ डॉलर होती. सध्या ही किंमत प्रति बॅरल ८६ डॉलरच्या वर पोहोचली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमती नीचांकी पातळीवरून २६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्चे तेल का महाग होत आहे? जग कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे. याशिवाय मध्य पूर्वेतही तणावाचे वातावरण आहे. सोमवारी, संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळावर ड्रोन हल्ल्याने नवीन संकटाला जन्म दिला आहे, ज्याचा परिणाम तेल उत्पादनावर होण्याची अपेक्षा आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या घडामोडींचा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या उत्पादनावर …
Read More »बँक एफडीचा लॉक इन पिरीअड ३ वर्षांचा ? IBA ने वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला
मराठी ई-बातम्या टीम इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने बँक एफडी अधिक आकर्षक बनवण्यासाठी अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. अर्थसंकल्पात या एफडीचा लॉक इन पिरिअड ५ वर्षांवरून ३ वर्षांपर्यंत कमी करण्यात यावा. तसेच एफडीमधील गुंतवणूकीला करात सूट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बजेटच्या आधी, IBA ने बँकेच्या मुदत ठेवी (FDs) आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. IBA ने म्हटले की, …
Read More »धक्कादायक बातमी: कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी वाढ ऑक्सफॉमच्या अहवालानुसार देशातील टॉप १० श्रीमंताकडे ४५ टक्के संपत्ती
मराठी ई-बातम्या टीम कोरोना महामारीच्या काळात एकीकडे देशातील गरीब जनतेसमोर खाण्यापिण्याचे संकट असताना दुसरीकडे या काळात देशातील श्रीमंतांची संख्या वाढली आहे. वर्ष २०२१ मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या १०२ वरून १४२ झाली असल्याचे एनजीओ ऑक्सफॅम इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे. आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२२ चा पहिला दिवस आहे. या निमित्ताने ऑक्सफॅम इंडियाने वार्षिक असमानता सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यानुसार, कोरोनाच्या काळात भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती दुप्पट झाली आहे. त्यांच्या संपत्तीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की टॉप १० श्रीमंतांकडे इतकी संपत्ती आहे की ते पुढील २५ वर्षे देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये चालवू शकतात. कोरोनामुळे विषमता इतकी वाढली आहे की देशातील सर्वात श्रीमंत १०% लोकांकडे देशातील ४५% संपत्ती आहे. त्याच वेळी देशातील ५०% गरीब लोकांकडे फक्त ६% संपत्ती आहे. अहवालात म्हटले आहे की, जर भारतातील टॉप १०% श्रीमंत लोकांवर १% अतिरिक्त कर लावला गेला तर त्या पैशातून देशाला १७.७ लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर मिळतील. त्याच वेळी देशातील ९८ श्रीमंत कुटुंबांवर १% अतिरिक्त कर लावला, तर त्या पैशातून आयुष्मान भारत कार्यक्रम पुढील सात वर्षे चालवता येईल. आयुष्मान भारत हा जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम आहे. या आर्थिक असमानता अहवालानुसार, देशातील १४२ अब्जाधीशांची एकूण संपत्ती ७१९अब्ज डॉलर म्हणजेच ५३ लाख कोटी रुपये आहे. ९८ श्रीमंत लोकांकडे ५५५ कोटी गरीब लोकांइतकीच संपत्ती आहे. ही संपत्ती सुमारे ६५७ अब्ज डॉलर म्हणजे ४९ लाख कोटी रुपये आहे. या ९८ कुटुंबांची एकूण संपत्ती भारत …
Read More »