Breaking News

अर्थविषयक

१८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमाने घेणार उड्डाण बुकींग मर्यादा काढून टाकली

मुंबई: प्रतिनिधी विमान कंपन्या आणि देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने विमान कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून सर्व जागांसाठी तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे. कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे फ्लाइटवरील क्षमता मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानभाडे कमी होण्याची शक्यता आहे. हवाईवाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना सवलत देताना त्यांना आणि प्रवाशांना कोविडशी संबंधित नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये, विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणांमध्ये ७२.५ टक्के ऐवजी ८५ टक्के जागा बुक करण्याची परवानगी दिली. यापूर्वी जुलैमध्ये तिकिटे ५० टक्के ऐवजी ६५ टक्के जागा बुक करण्याची परवानगी होती. कोविड 19 रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च २०२० रोजी परदेशी उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घातली होती. पण गेल्या वर्षी मे पासून ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त काही देशांसोबत ‘द्विपक्षीय हवाई बबल’ व्यवस्थेअंतर्गत जुलै २०२० पासून दोन्ही देशांदरम्यान परदेशी उड्डाण सेवा सुरू आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार, लोकांमध्ये हवाई प्रवासाची मोठी मागणी पाहता देशांतर्गत उड्डाण सेवांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. १८ …

Read More »

राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअरही आता आकाशात झेपावणार नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी

मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअर या नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी मिळाली आहे. केंद्रीय नागरी नागरी उड्डायन मंत्रालयाने अकासा एअरलाईन्सला विमान उड्डाणाचा ना हरकत दाखला दिला आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीअंतर्गत अकासा एअर सेवा देणार आहे. कंपनीला आता नागरी हवाई वाहतूक महासंचालक …

Read More »

मार्केट कॅप आणि कॅपिटलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज १ ल्या स्थानावर मार्केट कॅपिटलमध्ये प्रथमच कोट्यावधीवर

मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल प्रथमच १७ लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहेत.  सोमवारी सकाळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅपिटल मोठ्या प्रमाणावर वाढले. समूहाचा विचार करता टाटा समूह सध्या मार्केट कॅपमध्ये सर्वात पुढे आहे.  टाटा समूहातील एकूण २९ …

Read More »

एसबीआयची फेस्टिव्हल ऑफर; पर्सनल, कार, गोल्ड लोनचे व्याजदर घटवले नवरात्रीसाठी खास ऑफर

मुंबई : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या नवरात्रीसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये एसबीआय पर्सनल लोन, कार आणि सोने तारण  कर्ज कमी व्याज दरात देत आहे. याशिवाय बँकेने कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय सध्या ७.२५ टक्के व्याज दराने कार कर्ज देत आहे. ग्राहकांना कारच्या …

Read More »

१८ हजार कोटींना विकत घेतलेल्या एअर इंडियाचे इतक्या रकमेचे कर्ज फेडणार टाटा केंद्र सरकार घेणार २० हजार कोटींचे कर्ज

मुंबई : प्रतिनिधी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची आता पुन्हा घरवापसी झाली आहे. टाटा समूहाने १८,००० कोटी रुपयांना एअर इंडिया खरेदी केली. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे. तसेच एअर इंडियाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे जवळपास ५० टक्के कर्ज टाटाला फेडावे लागणार आहे. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये टाटा समूहाने एअर इंडियाची बोली जिंकणे ही मोठी बातमी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पण त्यामुळे टाटा समूहाला विमान उद्योगात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. काही उद्योग खासगी क्षेत्रासाठी उघडण्याच्या धोरणाबद्दल रतन टाटा यांनी सरकारचे कौतुक केले. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि कन्सोर्टियमचे नेते, एअर इंडियासाठी दुसऱ्या क्रमांकाची  सर्वाधिक बोली लावणारे अजय सिंह यांनी या करारासाठी टाटा समूह आणि सरकार दोघांचे अभिनंदन केले. एअर इंडियाच्या बोलीसाठी शॉर्टलिस्ट होणे ही त्यांच्यासाठी …

Read More »

सणासुदीच्या काळात ‘ह्या’ १० बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, त्वरीत घ्या लाभ रिझर्व्ह बँकेने पतधोरण जैसे थे ठेवले तरी बँकाकडून स्वस्त कर्ज

मुंबई: प्रतिनिधी या सणासुदीच्या काळात तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या अनेक बँकां, गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृह कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. हे गृहकर्जाचे व्याजदर गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी आहेत. 1. एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ …

Read More »

गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली, आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ऐन सणासुदीतही नागरीकांना महाग कर्जच घ्यावे लागणार

मुंबई: प्रतिनिधी गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आता कमी झाली. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक शुक्रवारी पार पडली.  आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात काहीच बदल केला नाही. आढावा बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास …

Read More »

गुगललाही आहे तुमच्या सुरक्षेची काळजी, जाणून घ्या नक्की काय करते गुगल टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या सुविधेमुळे बँकींग व्यवहार सुरक्षित

मुंबई: प्रतिनिधी बँकिंग तसंच आर्थिक देवाण-घेवाणीची सर्व कामं आता ऑनलाईन झाली आहेत. मात्र ऑनलाइन व्यवहारामुळे आर्थिक फसवणुकीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. सरकार आणि बँकांकडून लोकांना या ऑनलाईन फ्रॉडपासून काळ काळजी घ्यावी हे पण वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण आता त्याबाबत काळजी घेत आहे. आपण केवळ आपल्या ऑनलाइन सुरक्षेचीच काळजी …

Read More »

इंटरनेट बँकींगद्वारे व्यवहार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी IMPS द्वारे आता २ लाखाऐवजी करा ५ लाख रुपये ट्रान्सफर : आरबीआयचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही पैशाचे व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने आयएमपीएस द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे. आता २ लाख रुपयांऐवजी तुम्ही एका दिवसात ५ लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. याशिवाय आता आरटीजीएस व्यवहार आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास ( 24X7 ) …

Read More »

नवरात्रीच्या मुहुर्तावर अंमलात आणा आर्थिक नियोजनाच्या ९ बाबी आर्थिक स्वातंत्र्यांच्या दिशेने पहिलं पाऊल उचला

मुंबईः प्रतिनिधी नवरात्र आजपासून (७ ऑक्टोबर) सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करतो. या पूजेबरोबरच जर आपण आपल्या आर्थिक नियोजनाच्या दिशेनं पावले टाकली तर भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक नियोजन म्हणजे आपलं उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचं एक चक्रच असतं. भविष्यात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी उपयुक्त …

Read More »