Breaking News

राजकारण

दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्याप्रश्नी राज्यपालांचे लक्ष वेधणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे शिष्टमंडळ गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्षातील आमदारांचा समावेश राहणार आहे. या भेटीबाबत …

Read More »

महाराष्ट्र मॅग्नेटीक नाही तर पथेटीक झाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मँग्नेटीक महाराष्ट्रच्या गुंतवणूकीचे आयोजान केले. मात्र वास्तविक मध्ये महाराष्ट्र हे मँग्नेटीक राज्य नाही तर पथेटीक राज्य झाल्याचा टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत राज्यातील गुंतवणूकीचे खरे चित्र दाखविण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आझाद मैदानालगत असलेल्या काँग्रेसच्या …

Read More »

आंदोलनात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाचा नवा फतवा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने आपल्या विविध मागण्यांच्या प्रश्नी महामोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा फतवा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आला आहे. शासकिय सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी महामोर्चाचे आंदोलन मंत्रालयासमोर करण्यात येणार …

Read More »

गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात, त्याप्रमाणे शेतक-यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का?  सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला …

Read More »

होय, आम्ही शिवस्मारकाच्या कामाला गती देण्यास कमी पडलो छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांची कबुली

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक निर्माण करण्याची घोषणा आम्ही केली. तसेच या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र भूमिपूजन होवून एक वर्ष झाला तरी या शिवस्मारकाच्या कामास गती देण्यास आम्ही कमी पडल्याची स्पष्ट कबुली भाजप सरकारमधील घटक …

Read More »

‘महाराष्ट्र सरकारचे मँग्नेटीक‘ उध्दव ठाकरेंना खेचू शकले नाही ठाकरेंच्या गैरहजेरीत महाउद्योगरत्न सन्मान रजनीला सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचविण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या मँग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाकडे सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उध्दव ठाकरे यांना विशेष पाहुणे म्हणून राज्य सरकारकडून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ठाकरे हे गैरहजर राहील्याने या कार्यक्रमातील मँग्नेटीक …

Read More »

अतिरेक्यांकडून ठार झालेल्यांना आपण शहीद मानत नाही : साध्वी प्रज्ञासिंग जास्तीत जास्त मुले जन्माला घालून माझ्याकडे द्या: नागरीकाना आवाहन

औरंगाबाद : प्रतिनिधी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांकडून ठार झालेल्यांना आपण शहीद मानतच नसल्याचे खळबळजनक वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून जामीनावर बाहेर आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग हीने सोमवारी औरंगाबादेत केले. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्यांच्या अंकित संघटनांचा कथित देशप्रेमाची भूमिका उघडकीस आली. शिवजयंती आणि जनूभाऊ रानडे यांच्या स्मृतीदिना निमित्त सिडकोतील संत तुकाराम …

Read More »

कधी होणार स्मारक? भाजपकडून राजकारणासाठी शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर : विखे-पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी फक्त राजकारण करण्यासाठी आणि मते गोळा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणीच्या घोषणा भाजप सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र हे दोन्ही स्मारक केव्हा होणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारला विचारला. रविवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी अरबी …

Read More »

भाजप सरकारचा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हेतर ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ जरी आयोजन केलेले असले तरी या सरकारने यापूर्वीच ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ निर्माण केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सोमवारी लोणी येथे शिवजयंती समारोहानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी अनेक मुद्यांच्या आधारे सरकारवर जोरदार तोफ डागली. आज संपूर्ण राज्यात …

Read More »

औरंगाबाद पाठोपाठ कोपरगावमध्ये भाजप विरोधात राडा श्रीपाद छिदमच्या वक्तव्याचे पडसाद

औरंगाबाद: प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिदम यांनी काढले. त्या निषेधार्थ काल औरंगाबादेत भाजपचे कार्यालय फोडल्यानंतर आज कोपरगांव मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्याने तेथे वातावरण तणावग्रस्त बनले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही …

Read More »