Breaking News

राजकारण

आधी बनवा आणि मग नावाची भांडणे करा समृध्दी महामार्गाला नाव देण्याच्या मागणीवरून नवाब मलिक यांचा सेना-भाजपला टोला

मुंबई : प्रतिनिधी समृध्दी महामार्गातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृध्दी महामार्ग बनवा नंतर नावाची भांडणे करा असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. समृध्दी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दयावे अशी मागणी शिवसेनेने तर भाजपने माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची …

Read More »

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आता ६५ वर्षे दोन लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात …

Read More »

सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश

मुंबईः प्रतिनिधी जाती-जातीमध्ये…धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे…या शक्तीच्याविरोधात सामना करण्यासाठी तयार होतानाच आपल्याला नेहरु,मौलाना आजाद,आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मौलाना …

Read More »

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नाव देण्याच्या मागणीने शिवसेनेची भाजपवर कुरघोडी समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेने युती करावी यासाठी एकाबाजूला भाजपकडून मिनत्या सुरु आहेत. त्यास पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र नियोजित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे घाटत असतानाच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी …

Read More »

अवनी वाघिणीच्या हत्येचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री मुनगंटीवार विरूध्द शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी

मुंबई: प्रतिनिधी नरभक्षक आवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून राज्याच्या राजकारणात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगल्याचे दिसत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये या अवनीप्रकरणावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा धरणार …

Read More »

वाघिण मृत्‍यु प्रकरणी हीन दर्जाचे राजकारण करू नये भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी टी-1 (अवनी) या नरभक्षक वाघिणीच्‍या मृत्‍युप्रकरणी वन्‍यजीव प्रेमी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख यांनी जे हीन दर्जाचे आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागण्‍याचे प्रकार सुरू आहेत ते पूर्णपणे अयोग्‍य आहे. या नरभक्षक वाघिणीच्‍या मृत्‍युचे राजकारण करणे योग्‍य नाही. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार ही कार्यवाही वनविभागाने केली आहे. मुळात …

Read More »

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंपर्क अभियानाची नांदेडमधून सुरुवात जनविरोधी भाजप सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचे चव्हाण यांचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी विश्वासघातकी,जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली असून राज्यव्यापी अभियानाचा प्रारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी  खा.अशोकराव चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर …

Read More »

नोटबंदीची दोन वर्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा दोन वर्षातील घोषणा आणि त्यातील फोलपणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी लिहिलेला लेख

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १००० रूपयांच्याचलनी नोटा रद्द करण्यात येत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर उद्यापासून ते ‘एक कागज का तुकडा’ होणार आहेत. लक्ष्मीपूजन होणाऱ्या ह्या देशात ही  भाषा कितपत योग्य आहे हा तर मुद्दा आहेच, मात्र दोन वर्षांनंतर ह्या धमकी …

Read More »

विधानसभा-लोकसभेच्या निवडणूका एकत्रित घेणार ? जनतेचे जनमानस जाणून घेण्यासाठी कंत्राटी नोकर भरतीची सरकारची जाहीरात

मुंबईः प्रतिनिधी संसदेच्या लोकसभा सभागृहाची मुदत येत्या मे २०१९ रोजी संपत आलेली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकिय पक्षांकडून लोकसभेच्या निवडणूकीची पूर्व तयारी सुरु केलेली असताना केंद्रातील भाजप सरकारसोबतच राज्यातील विधानसभेची निवडणूक घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूकांना सामोरे जाण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. …

Read More »

राज्य सरकारच्या कारभाराची २०० पोस्टर्स मुंबईत लावणार मुंबई काँग्रेस काढणार कारभारांची वाभाडे

मुंबईः प्रतिनिधी मागील चार वर्षात राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात जनतेला मिळालेले अच्छे दिन यांचे वास्तव दर्शविणारे तब्बल २०० पोस्टर्स मुंबई काँग्रेसकडून लावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. राज्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच गुंतवणूक आणण्याच्यादृष्टीने मेक इन …

Read More »