Breaking News

राजकारण

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव हेमंत टकले यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी चार वर्ष सत्तेत आहात मग कोणी थांबवलं होतं कायदा करायला आणि राममंदीर बनवायला. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपवण्याचा विचार करत नाही तर तो विषय तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरुन लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करता येईल असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार हेमंत टकले यांनी …

Read More »

देशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिपादन

शिर्डी : प्रतिनिधी देशातील बेघरांना सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचा संकल्प सरकारने केला असून गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरांची मुलभूत सोईसुविधांसह निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन, राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या …

Read More »

राज्यात भाजपला एकहाती विजय मिळणे अवघड रा.स्व.संघाच्या सर्वेक्षणात माहिती पुढे

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. या निवडणूकीत २०१४ ची पुनरावृत्ती होणार की विरोधी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा सोपान मिळणार याची चाचपणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला लागली आहे. त्यादृष्टीने संघाने सुरु केलेल्या सर्वेक्षणात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला वारू रोखला जाणार असल्याची …

Read More »

मराठा आऱक्षणाचा निर्णय भाजपच्या यशापशावर परिणाम करणार न्या.गायकवाड समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच निवडणूकीच्या रणधुमाळीला अजून प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसली तरी मराठा आरक्षण, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हळूहळू ऐरणीवर येत आहे. त्यातच मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अहवाल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्य सरकारला सादर करण्यात येणार असून त्या …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी ग्रामविकास खात्याकडून २ कोटींचा खर्च गर्दी जमवण्यासाठी ग्रामविकास खात्याचे लेखी आदेश असल्याचा धनंजय मुंडेचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी राज्य दुष्काळात होरपळत असताना, तिजोरीत खडखडाट असताना आणि राज्य कर्जबाजारी झाले असताना शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमासाठी ग्रामविकास खाते करत असलेल्या दोन कोटी रूपयांची उधळपट्टी कशाला, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केला. मोदी लाट पूर्णपणे ओसरल्याने शासकीय खर्चाने माणसे आणण्याची …

Read More »

आदिवासींना घरे देण्यावरून राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री संघर्षाच्या पावित्र्यात राज्यमंत्री वायकर ४८० चौ.फुटाचे घर देणार तर मुख्यमंत्री म्हणतात ३०० चौ.फुटाचे घर देवू

मुंबईः प्रतिनिधी आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. मात्र इतक्या मोठ्या आकाराची घरे आदिवासीना देता येणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींना ३०० चौरस फुटाची …

Read More »

भाजप कार्यालयापासून राष्ट्रवादीच्या एल्गार आंदोलनास सुरुवात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक

मुंबईः प्रतिनिधी वाह रे मोदी तेरा खेल…घरपोच दारु महेंगा तेल…मोदी सरकार हाय हाय… सरकार हमसे डरती है…पुलिस को आगे करती है… महागाई रद्द झालीच पाहिजे…लोडशेडिंग रद्द झालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई राष्ट्रवादीच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आणलेले ‘गाजर’ चक्क …

Read More »

सरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफाम काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी राज्यभरामध्ये अतिरेकी कारवाया करणा-या सनातन संस्थेशी संबंधित अनेक जणांना रंगेहात पकडले असतानाही सनातन संस्था आणि त्यांच्या प्रमुखांवर अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून २००८ साली झालेल्या बॉम्ब स्फोटात सनातनच्या साधकांचा हात होता हे पुढे आणले आहे. असे असतानाही राज्य सरकार …

Read More »

दारू नको तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले

मुंबईः प्रतिनिधी घरपोच ऑनलाईन दारू पोहोचविण्याचा प्रकार आक्षेपार्ह व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली. काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला घरपोच दारू पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यावर एकाबाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत …

Read More »

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत विदयार्थ्यांवर अन्याय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत ८३३ विदयार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या भविष्याचा विचार करुन राज्यसरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह ( परिवहन) विभागातंर्गत २३ डिसेंबर २०१६ ला …

Read More »