Breaking News

राजकारण

सिंह आणि वाघ एकत्र : दोघांच्या रस्त्यात येणाऱ्या उंदराचा निपात करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांच्या मूषक पूराणाला उत्तर

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सिंह आणि वाघ एकत्र येवून दमदार सत्ता सध्या राबवित आहोत. आणि असेच वाघ आणि सिंह एकत्र रहात २०१९ मध्येही आम्ही सत्ता राखू. वाघ आणि सिंहाच्या यांच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा निपात करू असे अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांच्या मूषक पूराणावर पलटवार केला. विरोधी पक्षनेते …

Read More »

मंडी टोळी आणि ‘त्या’ मंत्र्याच्या संबंधांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करा! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा विदर्भातील कुख्यात मंडी टोळीवर हल्लाबोल केला. राज्यातील एक मंत्रीच या टोळीचा तारणहार असल्याच्या आरोपाचा त्यांनी पूनरूच्चारही केला. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर गुप्तचर विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना …

Read More »

आणि मंत्री देशमुखांचे आव्हान राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्विकारले नाही तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्विकारण्याची दोन्ही नेत्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सोलापूर शहरात महापालिकेच्या जागेवर माझे घर असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी केला. मात्र मी सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आहे. माझ्या कामातून मी सर्व कारखाने उभे केले. तुम्ही सत्तेत होतात. मी नव्हतो. त्यामुळे मी सरकारी योजनेतला एकही पैसा न घेता सर्व उद्योग उभा केलाय. तुम्ही दाखवून …

Read More »

न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी लवकरच निकाल म्हणून आम्हीही मोठा वकील परवडत नसताना लावल्याचे मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी न्यायमूर्ती लोया मृत्यू संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूचं म्हणणं संपलं आहे. ही केस क्लोस टू ऑर्डर आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणातील लवकरच येणार असून या खटल्यात विरूध्द बाजूने महागडे वकील लावण्यात आल्याने राज्य सरकारच्यावतीनेही फि परवडत नसताना मोठा वकील लावण्यात आला असल्याचे सांगत न्या.लोया यांच्या मृत्यू संदर्भात …

Read More »

नमोप्रमाणे ‘महामित्र’ ची मालकी खाजगी कंपनीकडे लाखो युजरची माहिती धोक्यात असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे सुरु झालेल्या नमो अँपनंतर आता ‘महामित्र’ सोशल मिडीयीच्या माध्यमातून डेटा प्रायव्हसीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. तसेच या अँपद्वारे जमा होणारी सर्व माहिती अनुलोम या खाजगी कंपनीकडे जमा होत असल्याचा गौप्यस्फोट  राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी …

Read More »

खेड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेची तात्काळ सीआयडी चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस प्रशासनाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची काल सोमवारी घटना घडली. यासंदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करत त्याचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे काल भिमा कोरेगांव येथील दलितांवर झालेल्या हिसांचार प्रकरणी संभाजी भिडे याला अटकेसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. विधिमंडळाच्या दोन्ही …

Read More »

भिमा कोरेगांव प्रकरणी भिडेंचा सहभाग नसल्याचा मुख्यमंत्र्याचा खुलासा विधानसभेतील चर्चेला उत्तर देताना माहिती

मुंबई : प्रतिनिधी १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. मात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याबाबतचा तपास केला. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. मात्र त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे आतापर्यंत आढळून आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. …

Read More »

दोन दिवस गोंधळ घालून अखेर विरोधकांकडून अविश्वास ठराव मागे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठराव मागे घेतल्याचे केले जाहीर

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कामकाज पध्दतीवर आक्षेप नोंदवित त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव विरोधकांनी मांडला. मात्र हा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून अध्यक्ष बागडे यांच्यावर विश्वासदर्शक ठराव मांडत विरोधकांच्या ठरावातील हवा काढून घेण्यात आली. त्यावरून विरोधकांनी दोन दिवस सतत गोंधळ घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. मात्र …

Read More »

पंतप्रधान मोदी, आमच्या नादीला लागू नका ! एल्गार मोर्चाच्या समारोपाप्रसंगी अँड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी देशाचा रखवालदार म्हणवून घेणाऱ्या रखलवादाराकडून आता रखवालदारी काढून घेण्याची वेळ आली असून या रखवालदाराला एकच सांगतो आमच्या नादी लागू नको. आम्ही फकीर आहोत. त्यामुळे आम्ही उद्या जेलमध्ये गेलो, तरी फरक पडणार नाही. मोदींना असे वाटत असेल शिवाजी महाराजांच्या जयंतीला भिडे आणि स्वत:च फोटो टाकले म्हणजे झाले. मोदी, …

Read More »

अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावरुन सत्ताधारी विरोधक आमने-सामने गोंधळामुळे विधानसभा तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाऐवजी राज्य सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडत तो लगबगीने शुक्रवारी मंजूर केला. त्यावरून आज सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले. शुक्रवारी सत्ताधाऱ्यांनी जे कामकाज केले ते म्हणजे विधानसभेच्या …

Read More »