Breaking News

राजकारण

औरंगाबादच्या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता जमिन उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरे यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादेतील कचरा डेपोचा प्रश्नाला गंभीर वळण लागलेले असल्याने त्याचे परिणाम राजकिय क्षेत्रात दिसू लागले. मात्र या कचरा डेपोसाठी पर्यायी जमिन देण्यासंदर्भात शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही कचरा प्रक्रियेसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच कचऱ्याच्या प्रश्नामुळे …

Read More »

…आणि पृथ्वीराज चव्हाण संतापले हक्कभंग आणण्याचा मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा

मुंबई : प्रतिनिधी अरबी समुद्रातील नियोजित स्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत करताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भलतेच संतापले आणि म्हणाले की, पुतळ्याची उंची कमी केल्याचे पत्र दाखवू का ? नाही तर तुमच्या विरोधात हक्कभंग आणेन असा …

Read More »

मंत्री चेंबरमध्ये बसून अंडी उबवतात का? अजित पवार यांचा मंत्र्यांना उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्वाची चर्चा सुरु असताना विधानसभेत एकही मंत्री उपस्थित नाही. याचा अर्थ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी गंभीर नसल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी करत सभागृहात बसायचे सोडून मंत्री आपल्या चेंबरमध्ये बसून काय अंडी उबवतात का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची मागणी : विरोधकांचा सभात्याग

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधले जाणार आहे. त्याच्या निविदा ही आता निघाल्या आहेत. मात्र आम्ही सरकारमध्ये असताना जगात सर्वात उंच पुतळा या स्मारकात बांधण्याचा निर्णय घेतला होता. पण आताच्या सरकारने पुतळ्याची उंची ११२ फुटाने कमी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील …

Read More »

अखेर गरीबांना रेशनवर मिळणारी साखर बंद केंद्रानेच गरीबांची साखर नाकारल्याचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांचा खुलासा

मुंबई : बी.निलेश ‘सबका साथ सबका विकास’ चा नारा देत विकासाच्या घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रेशन दुकानावर मिळणारी गरीबांची साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारने रेशनवर द्रारीद्रय रेषेखालील लोकांना पुन्हा साखर मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवला पण तोही फेटाळून लावल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा …

Read More »

वित्त विभागाने पैसे न दिल्याने बालकांना आणि महिलांना पोषण आहार नाही महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती : विरोधकांचा सभात्याग

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडीतील बालकांना आणि गर्भवती महिलांना पोषण आहार दिला जातो. मात्र राज्याच्या वित्त विभागाने पुरेसे पैसे दिले नसल्याने मागील काही दिवसांपासून पोषण आहार बंद करण्यात आल्याची धक्कादायक माहिती महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. परंतु आता पुरवणी मागण्यांमध्ये ४०० कोटी रूपये मागण्यात आले. मात्र …

Read More »

अखेर आमदार परिचारक यांना विधान परिषदेत येण्यास प्रवेशबंदी शिवसेनेसह विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याला यश

मुंबई: प्रतिनिधी सैनिकांच्या पत्नींच्या संदर्भात अपशब्द काढणारे अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची कारवाई रद्द करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नाला यश आले असून परिचारक यांना तूर्तास विधान परिषदेच्या सभागृहात येण्यास बंदी घालण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी …

Read More »

सातवा वेतन आयोगामुळे २१ हजार कोटींचा अतिरिक्त भार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी, निमशासकीय व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असून या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे शासकीय तिजोरीवर दरवर्षी २१ हजार ५३० कोटींचा अतिरिक्त भार पडेल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी उपस्थित …

Read More »

भुजबळांवर उपचार होण्यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीसांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री राहीलेले छगन भुजबळ हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील आरोपावर निर्णय कधी होईल तेव्हा होईल. सध्या भुजबळ हे आजारी असून त्यांच्या शरीरातील हेमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच त्यांना इतर काही त्रासही होत आहे. मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी राहीलेल्या व्यक्तीला सार्वजनिक रूग्णालयात दाखल करण्यात येते. तसेच …

Read More »

औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्नी पुन्हा एकदा बैठक घेणार विरोधकांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्नी स्थानिक नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला असल्याबाबतचा मुद्दा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपस्थित करत याप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी विधानसभेत केली. त्यावर औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर लवकरच पुन्हा एकदा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन देत …

Read More »