Marathi e-Batmya

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ही कसली शस्त्रसंधी, स्फोटाचे आवाज येतायत

शनिवारी दुपारी ३ वाजता गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत भारत आणि पाकिस्तानात शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच श्रीनगर आणि उधमपूरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आले आणि दोन्ही शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी लहान शस्त्रे आणि तोफांचा मारा केला आहे. मागील दोन रात्रीच्या आक्रमक कारवाईच्या पद्धतीनुसार जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमधूनही पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत.

सूत्रांनी सांगितले की, उधमपूरमध्ये जोरदार गोळीबार झाला आणि श्रीनगरमध्ये अनेक स्फोट झाले. सायरन वाजले आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले.

रात्री ९.१५ वाजता, आकाशात स्फोट आणि हलक्या रेषांचा व्हिडिओ पोस्ट करताना जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ही युद्धबंदी नाही. श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या हवाई संरक्षण तुकड्या आताच ओपन केल्या आहेत.

१५ मिनिटांपूर्वीच्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते, “काय झाले युद्धबंदीचे? श्रीनगरमध्ये स्फोट ऐकू आले.

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी “येणाऱ्या हवाई हल्ल्या” बद्दल अलर्ट जारी केला. त्यांनी शहरात “तातडीची ब्लॅकआउट” करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, मागील अर्धातासाहून अधिक काळ जम्मू आणि काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले असले तरी कोणतेही स्फोटाचे किंवा गोळीबाराचे आवाज येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

शनिवारी (१० मे २०२५) आधी पंजाबने ब्लॅकआउट मागे घेतल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट पुन्हा लागू केले.
“पंजाबच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, अमृतसर, फिरोजपूर, फाजिल्का, पठाणकोट, गुरुदासपूर आणि भटिंडा या जिल्ह्यांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे.

Exit mobile version