भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पुढील चर्चेसाठी आज संध्याकाळी दोन्ही देशांच्या डिजीएमओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होत आहे. तत्पूर्वी आज दुपारी भारतीय डिजीएमओच्या अधिकाऱ्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारताने केलेला हल्ला फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात होता. तो हल्ला कोणत्याही पाकिस्तानी सैन्याशी किंवा पाकिस्तान देशाच्या विरोधात नव्हता. पण पाकिस्तानी लष्कराने दुर्दैवाने दहशतवाद्यांच्या बाजूने भूमिका घेत आम्हाला विरोध करण्यास सुरुवात केल्याचे डिजीएमओतील वरिष्ठ अधिकारी तथा एअर मार्शल ए के भारती यांनी सांगितले.
पुढे बोलताना एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, भारताची लढाई दहशतवाद्यांशी आहे आणि पाकिस्तानने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला हे दुर्दैवी आहे. ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले गेले. तथापि, प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरपासून गुजरातपर्यंतच्या सीमावर्ती शहरांमधील नागरिक आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हवाई हल्ले केल्याचे सांगितले.
एअर मार्शल ए के भारती यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आणि तेही दहशतवाद्यांसाठी, आणि म्हणूनच आम्ही प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला, असेही यावेळी सांगितले.
एअर मार्शल ए के भारती म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर आणि भारताने पाकिस्तानी हवाई हल्ले कसे रोखले आणि निष्क्रिय केले यावर भाष्य करताना त्यांनी असेही म्हटले की, भारताच्या युद्ध-सिद्ध प्रणाली काळाच्या कसोटीवर उतरल्या असून त्या कोणत्याही परकीय आक्रमणाच्या विरोधात अभेद्य असल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना एअर मार्शल ए के भारती म्हणाले की, आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली, आकाश प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी. गेल्या दशकात भारत सरकारच्या अर्थसंकल्पीय आणि धोरणात्मक पाठिंब्यामुळेच शक्तिशाली एडी वातावरण एकत्र करणे आणि कार्यान्वित करणे शक्य झाले असल्याचेही यावेळी सांगत पाकिस्तानने वापरलेल्या ड्रोन आणि मानवरहित लढाऊ हवाई वाहनांच्या असंख्य हल्ले स्वदेशी विकसित केलेल्या सॉफ्ट अँड हार्ड-किल काउंटर-यूएएस प्रणाली आणि सुप्रशिक्षित भारतीय हवाई संरक्षण कर्मचाऱ्यांनी उधळून लावल्याचेही यावेळी सांगितले.
एअर मार्शल ए.के. भारती यांनी आपले सर्व लष्करी तळ, आपल्या सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यरत आहेत आणि गरज पडल्यास भविष्यातील कोणत्याही मोहिमा करण्यास सज्ज आहेत असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
शेवटी बोलताना एअर मार्शल ए के भारती म्हणाले की, भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव हा एक वेगळ्या प्रकारचे युद्ध होते आणि ते होणारच होते. देव करो, पण जर आपण दुसरे युद्ध लढले तर ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. हा एक मांजर-उंदराचा खेळ आहे आणि शत्रूला हरवण्यासाठी आपल्याला पुढे राहण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले.
Watch LIVE:
Media Briefing on #OpSINDOOR by DGMO & senior officers from the Indian Navy and Indian Air Force at National Media Centre. https://t.co/lxaq4XIr4t
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 12, 2025
या ब्रिफींगनंतर पत्रकारानी विविध विचारलेल्या प्रश्नोत्तरा दरम्यान पाकिस्तानी सशस्त्र दलांकडून तुर्की ड्रोन तैनात करण्याच्या प्रश्नावर, एअर मार्शल ए के भारती म्हणाले की, भारतीय सशस्त्र दल कोणत्याही तंत्रज्ञानाचा सामना करण्यास पूर्णपणे तयार आहे. तांत्रिक प्रगतीमुळे युद्धात बदल अपेक्षित आहे. भारतीय सैन्य त्यासाठी प्रशिक्षित आणि सुसज्ज असल्याचेही सांगितले.
अणुसंपत्तीचा साठा असलेल्या पाकिस्तानमधील किराणा हिल्सवर भारतीय सशस्त्र दलांनी हल्ला केल्याच्या प्रश्नावर, एअर मार्शलने हलक्या स्वरात सांगितले की त्यांना त्या ठिकाणी असलेल्या अणुस्थापनांची माहिती नव्हती, परंतु ते लक्ष्यांपैकी एक नव्हते.
व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी भारतीय नौदल दलाच्या हवाई क्षमतेची तपशीलवार माहिती देताना पुढे म्हणाले की, नौदलाच्या उपस्थितीमुळे पाकिस्तानी हवाई घटकांना बंद राहण्यास भाग पाडले गेले, ते सागरी क्षेत्रात विश्वासार्ह धोका असल्याचे नाकारले.
लेफ्टनंट जनरल राजीव घई यावेळी म्हणाले की, ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय बाजू “बहुस्तरीय काउंटर ड्रोन आणि हवाई संरक्षण ग्रिड” वापरून पाकिस्तानी प्रत्युत्तरासाठी तयार होती. दुसरीकडे सर्व भारतीय हवाई क्षेत्रे पूर्णपणे कार्यरत आहेत. पाकिस्तानी हल्ल्यांविरुद्ध भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या नंतरच्या घटनांचे फोटोही यावेळी दाखविले. “आम्ही शत्रूच्या लांबी आणि रुंदीला लक्ष्य केले आहे,” असे सांगत भारतीय बाजूने कमीत कमी नुकसान झाले असल्याचे यावेळी सांगितले.
