विशेष बातमी

लोकसभेच्या चवथ्या टप्प्यात अजेंडा रहीत निवडणूक

लोकसभा निवडणूकीच्या २०२४ च्या चौथ्या टप्प्यात सोमवारी ९६ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यासह २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आतापर्यंत, ३७९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे, ज्यात सोमवारी आंध्र प्रदेशातील सर्व २५ आणि तेलंगणातील सर्व १७ जागांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात एकाच वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व १७५ …

Read More »

देशातील जणगणनेचा पत्ता नाही, पण पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा आशियाई देशातील…

मागील पाच वर्षात नियमानुसार देशातील लोकसंख्येची जणगणना होणे आवश्यक होते. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ही जणगणना करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने मात्र जगभरातील विशेषतः आशियाई देशातील हिंदूची लोकसंख्या किती प्रमाणात घटली याविषयीचा अहवाल नुकताच सादर केल्याची माहिती पुढे …

Read More »

उच्च न्यायालयाचा निर्णयः शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा

शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा कारण ही सुविधा विद्यार्थ्यांना दिली जात आहे, जी प्रयोगशाळेच्या शुल्कासारख्या इतर शुल्कांपेक्षा वेगळी नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वर्गातील वातानुकूलनासाठी दरमहा ₹ २,००० शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळेविरुद्धची जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून …

Read More »

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार

जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात भारतीय हवाई दलाचे पाच सदस्य जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरनकोट येथील सनई गावात हा हल्ला झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या तुकड्या या भागात रवाना झाल्या आहेत. या घटनेत सामील असलेल्या …

Read More »

काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मोठा दिलासा

लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम सोबत जोडलेल्या …

Read More »

चोकलिंगम यांची माहिती, दुसऱ्या टप्प्यासाठी दोन मतदान यंत्रे तर अकोल्यात मात्र एक

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची …

Read More »

एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सात हजार ९१४ नागरिकांनी आपले म्हणणे मांडले होते. त्यापैकी सहा हजार …

Read More »

मतदार म्हणून नाव नोंदवलं नाही, पण मतदान करण्याची इच्छा आहेः बातमी वाचाच

निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे. राज्यात पाचव्या टप्प्यात २० …

Read More »

मतदार म्हणून काही अडचण आहे? मग हा फोन नंबर डायल करा

भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिले आहे. यांमध्ये सर्वसामान्य माहिती, अर्जाची स्थितिगती, मतदार ओळखपत्र …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य, एपीएमसीच्या जमिनीवर ५ स्टार हॉटेल? गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला

गुजरात उच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), सूरत यांना ५-स्टार हॉटेल बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी कथित गैरव्यवहार केलेल्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१९ एप्रिल) नकार दिला. जिल्हा मार्केट यार्ड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने योग्य असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »