विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाला दिले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नव्याने झोपड्या आणि अनधिकृत बांधकामे तयार होऊ …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, गुन्हा होऊच शकत नाही…मी तेथील आमदार
दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूलाची एक लेन पूर्णपणे तयार असताना मागील १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. डिलाईल पूल रस्ता नव्याने तयार करूनही मुंबई महापालिकेने बंद ठेवला होता. त्यावर वरळीचे आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी इतर नेत्यांसोबत जाऊन पुलावर रहिदारी बंदसाठी लावण्यात आलेले बॅरिक़ेड्स हटवून पुलाचे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तर बाळासाहेबांनी मोदींना शाबासकी दिली असती त्यांनी यायला नको होते
अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. हा योगायोग असून बाळासाहेब आज असते तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त फोर्ट …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांसाठी घेतले हे निर्णय
कालपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात होत्या. त्या फैरी सलग दुसऱ्या दिवशीही सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती. या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत काय चर्चा झाली याची माहिती पुढे येऊ शकली …
Read More »राज्यातील या तीन शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठे स्थापन करण्याची परवानगी
आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबई, उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या… मुंबईतील प्रत्येक भागात स्वच्छतेचे काम मोहिम स्वरुपात करावे
मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा झाली. मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी वेळ न दिल्याने अखेर नवी मुंबईची मेट्रो उद्घाटनाविनाच धावणार
राजकिय श्रेयनामावलीत आपलेही नाव जोडले जावे या उद्देशाने नवी मुंबई मेट्रोचे काम पुर्ण झालेले असतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने अखेर नवी मुंबईची मेट्रो उद्घाटनाविनाच धावणार असल्याचे खात्रीलायक माहिती नगरविकास विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. तर सिडको प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मेट्रो मार्गक्रमनाचा अधिकृत उद्घाटनाचा कार्यक्रम न …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, हा आनंदाचा शिधा आहे की, गोरगरीब जनतेची क्रुर थट्टा…
देशासह महाराष्ट्रातील ऐन सणासुदीच्या काळात जीवनाश्वक वस्तुंच्या दरात होणारी वाढ या पार्श्वभूमीवर आणि भाजपाप्रणित एकनाथ शिंदे यांचे सरकार किती जनसामान्यांच्या प्रती सहानुभूतीदारक आहे हे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी दिवाळी- दसऱा सणासुदीच्या अनुषंगाने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १०० रूपयात सणासाठी लागणाऱ्या वस्तू देण्याची घोषणा केली. ती योजना पुढील सणासुदीच्या काळातही …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सर्वांच्या विचार आणि स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सर्व जाती-जमातींच्या विचारांचा आणि स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आदिवासी बांधवांचा गौरव वाढवतानाच त्यांच्या विकासासाठी जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवसारख्या अभियानाच्या रुपाने आणखी एक पाऊल पुढे टाकले …
Read More »राज्यपाल रमेश बैस म्हणाले, आदीवासींनी संस्कृती टिकवली तर चांगला रोजगार मिळू शकतो
इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोली भाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. नंदुरबार येथे आज राज्यस्तरीय ‘जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक …
Read More »