Breaking News

Tag Archives: एनडीए

NEET UG प्रश्नी संसदेत विरोधकांचा गोंधळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित सोमवारपर्यंत कामकाज तहकूब

भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार प्रस्ताव मांडला. एनईईटीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला. जनता दल JD(S) खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी NEET मुद्द्यावर सरकारचे समर्थन केले, तर अध्यक्ष जगदीप धनकड यांनी खासदार सागरिका घोष, डेरेक ओब्रायन आणि साकेत गोखले …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा

केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने …

Read More »

लोकसभेचे उपसभापती पद न दिल्यास इंडिया आघाडी निवडणूक लढविणार एनडीए सरकारवर दबाव आणण्यासाठी आघाडीची रणनीती

लोकसभा निवडणूकीत एनडीए आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले. त्यानंतर आता बहुमत सिध्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडून पावसाळी अधिवेशन बोलावले असून या पावसाळी अधिवेशनातच सभापती आणि लोकसभेच्या उपसभापती पदावरील निवड करण्यात येणार आहे. परंपरेने सभापती पदावर केंद्रातील सरकारकडे असते, तर उपसभापती विरोधी पक्षांना देण्यात येते. मात्र जर उपसभापती …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामण, राजनाथ सिंग यांना तीच खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शपथ घेणाऱ्या त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आज खात्यांचे वाटप जाहिर केले. जून्या मंत्र्यांकडील खाती कायम ठेवत त्यांनी सातत्य राखण्यास प्राधान्य दिले. तसेच अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय, निर्मला सीतारामन यांना वित्त, जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार आणि नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि …

Read More »

अजित पवार यांच्यांकडून पहिल्यांदाच शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञपणा व्यक्त काँग्रेसमध्ये त्रास होवू लागल्याने राष्ट्रवादीची स्थापना

साधारणतः ११ महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत पक्षाच्या उभ्या यंत्रणेवरच अजित पवार यांनी दावा केला. सध्या तरी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेले यश आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांना दिली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ इतर मंत्रिमंडळाचे सदस्यांनी ही घेतली मंत्री पदाची शपथ

लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या एनडीएची सर्वात मोठी सदस्य संख्या असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पद व गोपनीयतेची शपथ दिली. …

Read More »

नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी, संध्याकाळी ६ वाजता होणार शपथविधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केला सत्तास्थापनेचा दावा

लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर सर्वाधिक जागा एनडीएला मिळाल्या. त्यानंतर एनडीएची बैठक आज संसदेत बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या सर्व सदस्यांनी एकमताने लोकसभा सभागृहाच्या नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यानंतर एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही नरेंद्र …

Read More »

भाजपाकडून एनडीएतील सहकाऱ्यांसाठी आखली सीमारेषा चंद्राबाबू नायडू आणि नितीनकुमार यांना हवे असलेल्या मंत्री पदाबाबत नकारघंटा

चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड (जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांची मागणी केली आहे. तथापि, भाजपा आपल्या मित्रपक्षांना काही प्रमुख पदे सहजासहजी स्वीकारू शकत नाही आणि संरक्षण, वित्त, गृह …

Read More »

नाना पटोले यांचा टीका,… जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला राहुल गांधींच्या पदयात्रेने देशातील चित्र बदलले, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर मिळाले

लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील १० …

Read More »

भाजपा बहुमतापासून दूरः नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीचे किंगमेकर? सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून पत्ते पिसायला सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …

Read More »