Breaking News

Tag Archives: काँग्रेस

नाना पटोले यांचे आवाहन, गाफील राहु नका लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा

भाजपा धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका …

Read More »

राहुल गांधी यांचा इशारा, भाजपाचे चक्रव्युह तोडू, जातीय जनगणनेचा निर्णय जाहिर करू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निर्माण केलेल्या चक्रव्युववर अदानी-अंबानीचे नियंत्रण

देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी झालेल्या हलवा पार्टीला फक्त २० अधिकारी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अदानी अंबानीचे प्रतिनिधी उपस्थित होते असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करत देशातील ९८ टक्के जनतेपैकी कोणीही या हलवा पार्टीला उपस्थित नव्हते असे सांगत यापैकी २ टक्के …

Read More »

नाना पटोले यांचे आव्हान, पुरावे आहेत तर कारवाई करा फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत का खोटे हे जाणण्याचा राज्यातील जनतेला अधिकार आहे. फडणवीस हे ७.५ वर्ष गृहमंत्री पदावर आहेत, त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडे काही व्हीडीओ व ऑडिओ क्लिप्स आहेत असा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपा- काँग्रेसने ओबीसी आरक्षणाला… ओबीसींच्या नावाखाली १०० लोक जमत नाहीत

एससी, एसटी यांचे आरक्षण हे घटनात्मक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला घटनात्मक दर्जा नाही. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपा यांना विचारले होते की, ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा देवू पण या दोन पक्षांनी भूमिका घेतली की, याला संविधानिक दर्जा द्यायचा नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश …

Read More »

नारायण राणे यांचा टोला… विरोधकांची टीका अज्ञानातून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच त्यांना नसल्याने राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. त्यांनी अर्थसंकल्पाबाबतचे तुटपुंजे ज्ञान पाजळू …

Read More »

विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत काँग्रेसची १० सदस्यीय समिती स्थापन महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा करणार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चेला महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने १० सदस्यांची समिती स्थापन केली. त्यापैकी ३ सदस्य मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. या समितीचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला इशारा, दहशतवाद्यांचे नापाक इरादे कधीही… अग्निपथ योजनेवरून काँग्रेसवरही सोडले टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील प्रॉक्सी युद्धाला पाकिस्तानचा पाठिंबा जाहीर केला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले. जम्मू भागात वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या सर्व नापाक प्रयत्नांमध्ये …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्या संकटातील नागरिकांच्या निवाऱ्याची सुरक्षितस्थळी व्यवस्था करावी

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. राज्यात काही दिवसांपासून पूर्व विदर्भ, …

Read More »

नाना पटोले यांचे आव्हान,… क्लिप आहेत, मग कारवाई करा, धमक्या कसल्या देता भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ईडी, सीबीआयकडून कारवाई.

भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे उघड आहे. ज्यांनी भाजपाची ऑफर स्विकारली ते पवित्र झाले व ज्यांनी नाकारली त्यांच्यावर यंत्रणाच्या माध्यमातून कारवाई करुन जेलमध्ये टाकण्यात आले. आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे देवेंद्र …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारडे पैसे, पण शेतकऱ्यांसाठी नाही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा

राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी …

Read More »