Breaking News

Tag Archives: काँग्रेस

नाना पटोले यांची टीका, शिंदे आणि पवार यांची भाषा म्हणजे मोदी-शाह यांची स्क्रिप्टच गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, काँग्रेसमध्ये कोणीही गद्दार नाही

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी …

Read More »

गुजरात न्यायालयाच्या निर्णयावर नाना पटोले यांचा सवाल, ललित मोदी, नीरव मोदी हे…? राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सर्वोच्च न्यायालयात जाऊ

राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही, परंतु राजकीय द्वेषातून …

Read More »

पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्षानं आधी फॉर्म भरायला लावला अन…नंतर सांगितलं गरज नाही मी भाजपामध्येच राहणार पण पक्षानंही माझ्या चर्चेवर बोलावं

नुकतेच बीड जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणीत समझौता झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. नेमक्या त्याच कालावधीत बीआरएस, एमआयएम आणि महादेव जानकर यांनीही रासपची ऑफर दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या नाट्यानंतर राज्य मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्री झालेले धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर पुन्हा बहिणीच्या घरी …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, ७० हजार कोटींचे आरोप करायचे अनं… काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचा प्रयत्न; कोणीही पक्ष सोडणार नाही

भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल :- एच. के. पाटील

महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून …

Read More »

नितेश राणे यांची टीका, राष्ट्रवादीच सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष संजय राऊत यांचे आता काँग्रेस लक्ष्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिवसेना – भाजपा सोबत सरकारमध्ये सामील झाल्याने आता महाविकास आघाडी पूर्णपणे नामशेष झाली आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रदेश प्रवक्ते अभिषेक मिश्रा,ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. अजित पवार …

Read More »

नाना पटोले यांचा खोचक टोला, एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादीच्या फुटीर गटासोबत…. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण, सत्तापिपासु भाजपाकडून पुन्हा तोडफोडीचे महाभारत

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून …

Read More »

नाना पटोले यांची टीका; हे ‘कुराज्य’ लवकर जावे, हीच राज्यातील जनतेची इच्छा भ्रष्ट, ईडी सरकारच्या वर्षभराच्या कार्यकाळात महाराष्ट्र १० वर्ष मागे

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन वर्ष झाले. हे एक वर्ष गद्दारी, राज्यातील जनतेशी केलेली बेईमानी तसेच दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला १० वर्ष अधोगतीकडे घेऊन जाणारे ठरले आहे. राज्यात हे असंवैधानिक, असंवेदनशील, भ्रष्ट ‘कुराज्य’ असावे असे स्वाभिमानी जनतेला अजिबात वाटत नसून लवकरात लवकर जावे हीच …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, राहुल गांधींना मणिपूरच्या लोकांना भेटू न देणे ही हुकुमशाही मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची कृती ‘रोमच्या निरो’ पेक्षाही असंवेदनशील

मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार ५२ दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्भाग्य आहे. ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या प्रवृत्तीलाही लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला आहे. केंद्र सरकार स्वतः काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे …

Read More »

नाना पटोले म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपावर ६ तारखेला काँग्रेसची बैठक तर अधिवेशनाआधी… शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित

राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले …

Read More »