राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचे काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, संसदीय, …
Read More »मतचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसचे मेट्रो व लोकल मध्ये जनजागृती अभियान भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या मतचोरीच्या विरोधात आंदोलन
देशात निवडणूका निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे पण लोकशाहीच्या या महत्वाच्या स्तंभावर संशयाचे ढग जमा झाले आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. या मतचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन …
Read More »शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु पुणे, नागपूर व औरंगाबाद, अमरावती विभागातील मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र १८ व १९ मध्ये प्राप्त …
Read More »बिहार विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात ६४.४६ टक्के मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले
गुरुवारी (६ नोव्हेंबर २०२५) बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदान संपले तेव्हा तात्पुरते ६४.४६% मतदान झाले, असे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) विनोद सिंग गुंजियाल यांनी सांगितले. दोन्ही आघाडीतील लहान पक्षांसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. सीपीआय (एमएल) ज्या २० जागांवर निवडणूक लढवत आहे त्यापैकी दहा जागा या टप्प्यात येतात, …
Read More »संजय राऊत यांचा इशारा, निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे देशाला दाखवून देणार
निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आणि मतदार संघांच्या याद्यांमध्ये घुसवले असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी करत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी …
Read More »बिहार विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले, दोन टप्प्यात १२१ मतदारसंघात मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदार, १४ नोव्हेंबरला होणार मतमोजणी
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने बिहारमध्ये सर्वच राजकिय पक्ष सज्ज झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होईल. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश …
Read More »आमदार रईस शेख यांची स्पष्टोक्ती, एसआयआरकडे लक्ष देण्यास राजकिय पक्षांना वेळ नाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली मागणी, स्थानिक निवडणूकांना समांतर केल्यास अनेकांची नावे कापली जाण्याची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात मतदार याद्या पुर्ननिरिक्षण (Special Intensive Revision – SIR) करण्याचे काम हाती घेतल्यास राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांना वेळ असणार नाही. परिणामी, मतदारांची मोठ्या संख्येने नावे कापली जातील, अशी भीती व्यक्त करत निवडणुका संपल्यानंतर फेब्रुवारीनंतर हा कार्यक्रम घ्यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख …
Read More »राहुल गांधी यांच्या आरोपाला केंद्रीय निवडणूक आयोगाचे डिजीटली उत्तर आरोपच चुकीचे असल्याचा निवडणूक आयोगाचे उत्तर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील आळंद मतदारसंघात आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याच्या कामात कशा पद्धतीने हलगर्जीपणा झाला त्यातून मतचोरीचे प्रकार कशा पद्धतीने घडले याचा पर्दाफाश केला. तसेच राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान आणि चमडी बचाव कामकाज पद्धतीवर टीका …
Read More »केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी
उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, ज्ञानेश कुमार लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतायत कर्नाटकातील आनंद आणि महाराष्ट्रातील राजूरा मतदार संघात बेकायदेशीर पद्धतीने मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याचे काम
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडून लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत एक टीम असून त्याच टीमकडून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि हरयाणात मतदार यादीतील काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून जाणीपूर्वक डिलीट करण्यात आले आहेत काही ठिकाणी …
Read More »
Marathi e-Batmya