Breaking News

Tag Archives: पंतप्रधान नरेंद्र मोदी

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, जीनाच्या थडग्यावर डोकं टेकविणारे नेते चालतात….

काल कोकणच्या दौऱ्यात माझ्या सोबत काही मुस्लिम आले. या माझ्या भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी मला त्यांचा मराठी भाषेतील कुराण हा ग्रंथ दिला. पण लगेच काहीजण म्हणतील की, यांनी हिंदूत्व सोडलं. पण अद्याप मी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापून खाल्ला नाही की, देशाची फाळणी करणाऱ्या जीनाच्या थडग्यावर जाऊन डोकं …

Read More »

सुभेदार (नि) टी. एम. सुर्यवंशी यांची मागणी, अपमान करणारी ‘अग्निवीर’ योजना रद्द करा

केंद्र सरकारने लष्करासाठी लागू केलेली ‘अग्निवीर’ योजना फसवी असून सैनिकांचा अपमान करणारी आहे. या योजनेत केवळ ४ वर्षांची सेवा करण्याची संधी दिली जाते, वेतन केवळ २१ हजार आणि निवृत्तीनंतर कोणतेही लाभ दिले जात नाहीत. ‘अग्निवीर’ योजनेतून लष्करात चार वर्ष सेवा केल्यानंतर या सैनिकांना ऐन उमेदीच्या वयातच वाऱ्यावर सोडले जाते. अग्निवीर …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी…

देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गौरवोद्गार काढले. विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापना

मागील अनेक वर्षापासून भाजपाच्या जाहिरनाम्यावर असलेल्या बाबरी मस्जिदीची जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याचे आश्वासन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करत तमाम हिंदूत्ववादी मतदारांच्या मनात आश्वासनपूर्तीचा विश्वास सार्थ ठरविला. सकाळपासूनच अयोध्येतील हनुमान गढी, सीताराम मंदिरासह अनेक ऋषींच्या मंदिराचे पूजन केले. त्यानंतर जवळपास १२ वाजता राम मंदिरातील रामलल्लाच्या मुर्तीचे विधिवत पूजन …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या केंद्र सरकारचा १० वा अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला

लोकसभा निवडणूकीचे पडघम प्रत्यक्ष वाजण्यास काही महिने शिल्लक राहिलेले आहेत. मागील ९ वर्षात देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे देशात सर्वाधिक तरूणाई असतानाही क्रयशक्ती पुरेशी निर्माण होताना दिसत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच जितक्या वेगाने देशाच्या विकासाची गती वाढायला हवी होती तितक्या वेगाने मंदावत …

Read More »

नीती आयोगाचा सर्वात मोठा दावा, २४.८ कोटी नागरिक दारिद्र्य रेषेतून बाहेर

कोरोना काळापासून देशातील प्रमुख आर्थिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झालेल्या असताना आणि वाढत्या महागाईचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने कोरोना काळापासून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत अन्न पुरवठा करण्याचा निर्णय घेत ८० कोटी नागरिक या मोफत धान्याचा लाभ घेत असल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहेत. त्यातच आज केंद्र …

Read More »

शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, तर ही घराणेशाही कशी ?

देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील मात्र त्याकडे कुठलेही लक्ष देण्यात आले नाही. देशातील प्रत्येक शेतकरी सध्या संकटात आहे. मात्र तरीदेखील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसंदर्भात कुठलेही ठोस निर्णय घेण्यात येत नाही असा आरोप …

Read More »

मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर, घराणेशाहीवर घरदांज माणसाने…

एकदिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काळाराम मंदिरात विधीवत पुजा केली. तसेच नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्धाटन करत देशातील राजकिय घराणेशाहीवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवयुवकांनी जास्तीत जास्त राजकारणात यावे असे आवाहन तरूणाईला केले. त्यावर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत …

Read More »

शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली

देशातील सर्वात जास्त लांबी असलेला २२ किमीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटात पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री …

Read More »

राष्ट्रपती मुर्मु यांनी सही केलेल्या त्या कायद्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडीत केंद्र सरकारकडून फक्त मर्जी असलेल्या लोकांनाच संधी देत असल्याची बाब निदर्शनास आणली गेली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी याचिका दाखल करून घेत मुख्य निवडणूक आयुक्त समितीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील असा निर्णय दिला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »