Breaking News

Tag Archives: पंतप्रधान

शरद पवार यांचा मोदींवर हल्लाबोल, गरज शेतकऱ्यांची… कर्जमाफी मात्र उद्योजकांची

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्य विषयावरून लक्ष हटविण्यासाठी भलत्याच प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत देशातील शेतकरी आजही कर्जबाजारी आहे. शेतकऱ्याला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्याची गरज आहे. या …

Read More »

भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात

मणिपूरमधील भाजपा सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला वॉर मेमोरियल येथेून यात्रेच्या शुमारंभास परवानगी नाकारल्यानंतर मणिपूरमधून तौंबल (Thoubal) या ठिकाणावरुन यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारताचा तिरंगा ध्वज राहुल गांधी यांच्या हाती देत १५ राज्यातून ६७०० किलोमीटर वाहणाऱ्या भारत जोडो …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांनी “घोंचू” म्हणत पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

मालदिवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताबरोबरील परराष्ट्र संबध तोडत भारताचा शत्रु असलेल्या चीनशी जवळीक साधली. तसेच आगामी काळात भारताचा हस्तक्षेप मालदिवकडून सहन केला जाणार नसल्याच्या मुद्यावर मालदिवसह चीनच्या अध्यक्षांकडून सहमती दर्शविली. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःला सनातनी राष्ट्रीयत्वाचे स्थान मिळविण्याच्या नादात परराष्ट्र नीती आणि देशापेक्षा स्वतःला वरचे स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदी हे स्वतःचा चीनने …

Read More »

अटल सेतूचे लोकार्पण करत पंतप्रधान मोदी म्हणाले, २ कोटी महिला लखपती…

महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन समर्पित भावनेने काम करीत असून महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजे, यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच येत्या काळात देशातील २ कोटी महिलांना लखपती बनविण्याचा केंद्र …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मोदी हे करणार असतील तर देशाची…

मोदी तुमच्या श्रीमंत मित्रांना अजून श्रीमंत करणं, मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, खाजगी कंपन्यांची कार्यालये आणि गुंतवणुकी विविध देशात असतात. सुरक्षा संशोधन आणि DRDO …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत …

Read More »

मुस्लिम संघटनांची मागणी, राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे राजकारण करू नका जमाते ए-इस्लामी संघटनेने केली मागणी

देशातील असंख्य भारतीय हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. मात्र या राम मंदिराच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे राजकियकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमाचा उपयोग भाजपाकडून त्यांच्या एका राजकिय साधणाचा वापर करत असल्याचा आरोप जमात ए-इस्लामी संघटनेने करत राम मंदिराच्या …

Read More »

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय …

Read More »

अयोध्येत विमानतळ, रेल्वेचे उद्धाटन करत पंतप्रधान मोदींकडून १५ हजार कोटींच्या…

देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील असलेल्या कथित राम जन्मभूमी परिसरात राम मंदीर उभारण्यात येणार आलेले आहे. तसेच त्याचे उद्घाटन २०२४ च्या पहिल्याच महिन्यात २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी पर्यटक आणि भाविकांसाठी प्रवासाच्या दृष्टीकोनातून विमानतळ आणि नव्या रेल्वे स्थानकाचा निर्माण करण्यात …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, पंतप्रधान खोटे बोलतोय… विधानसभा निवडणूकीत म्हणतो अशोक गेहलोत जादूगार तर मी चमत्कार दाखविणारा

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने है तैयार हम या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहिर सभेला ५ लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करत पंतप्रधान पदी असलेले …

Read More »