विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी आणि विधेयकावरील चर्चा आदी मुद्यावर किती वेळ आमदारांनी बोललं पाहिजे यावरून भाजपाचे योगेश सागर, शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी मत मांडले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपले मत मांडताना उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा करत कंत्राटी मंत्री सध्या असल्याची टीपण्णी …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचे टीकास्त्र, पंतप्रधान मोदी INDIA ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणतायत… मात्र मणिपूरप्रश्नी पंतप्रधान आजही संसदेत बोलायला तयार नाहीत
जवळपास अडीच महिन्यापासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात उफाळलेल्या हिंसाचार काही केल्या शमायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस मणिपूरमधील हिंसाचाराच्या नवनवीन घटनांचे व्हिडिओ आणि माहिती बाहेर येत आहे. त्यातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवसापासून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मणिपूरप्रश्नी चर्चेची मागणी केली. मात्र काल गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ …
Read More »मणिपूरप्रश्नी अमित शाहंचे बोलणे इंडियाने केले अमान्य, पंतप्रधान मोदीनींच बोलावं अखेर लोकसभेबाहेर विरोधक आणि सत्ताधारी भाजपाच्या खासदारांची परस्पर विरोधी निदर्शने
७० दिवसाहून अधिक काळ झाला एकाबाजूला मणिपूर राज्यात सुरु झालेल्या हिंसाचारामुळे ईशान्य भारतातील एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या हिंसाचाराच्या काळात आपले चार ते पाच देशांचे परदेश दौरेही करून आले. मात्र सविस्तर निवेदन केले नाही. अखेर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी संसदेत मणिपूर …
Read More »हम ने कर दिखाया असे जाहिरातून सांगणाऱ्या अदानी कंपनीची गुजरातवासियांकडून पोलखोल अहमदाबाद विमानतळ आणि परिसरात पाणीच पाणी
केंद्रात नरेंद्र मोदी प्रणित भाजपाचे सरकार आल्यापासून गौतम अदानी यांचा उद्योग सर्वात पुढे कसा काय या प्रश्नाचे उत्तर अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्चकडून या संस्थेकडून जारी करत अनेक गोष्टींवर संशय व्यक्त केला. त्याविषयीचे वादळ शांत होते न होते तोच अदानी विमानतळ कंपनीने इतरांनी बांधलेल्या विमानतळाची जबाबदारी घेतल्यानंतर सर्व दूरचित्रवाहिन्यांवर हम ने कर …
Read More »हसन मुश्रीफ महायुतीत; कोल्हापूरात सतेज बंटी पाटील यांची स्पष्टोक्ती, हे शक्य नाही मुश्रीफ-पाटील यांच्या दोस्तीला ब्रेक
कोल्हापूरच्या राजकारणात भाजपाला काही केल्या टिकू द्यायचे नाही असा चंग बांधलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज बंटी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहे. यापूर्वी भाजपाच्या महादेव महाडीक यांच्या बालेकिल्ल्याला हादरे देण्याचे कामही या जोडगोळीने केले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले हसन …
Read More »मणिपूरमधील भाजपा आमदाराकडूनच पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह न्युजलाँड्री या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट
साधारणतः दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर मधील हिंचासार काही केल्या शांत होण्याची चिन्हे दिसून येत आहे. अखेर मणिपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दट्ट्या दिल्यांनंतर व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा शासित मणिपूरबरोबर काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यांना लक्ष्य करत विरोधकांवरच टीका केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून भाजपाने केला साजरा राज्यात ठिकठिकाणी भाजपाचे सेवा कार्य
रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नागपूर येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, …
Read More »अजित पर्व आणि मणिपूर हिंचाचारावर संजय राऊत म्हणाले, कोणीही ट्विट करण्याची गरज नाही…. एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीचा २०१९ सालचा फोटो असून त्यावर लिहिलेली वाक्ये लोकांचं लक्ष वेधून …
Read More »मुख्यमंत्री शिंदे कुटुंबियासोबत पंतप्रधान मोदी यांना भेटले, “पण आज आई असायला हवी होती…” इर्शाळगड ते धारावी सर्व विषयांवर चर्चा झाल्याची माहिती
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीसा पाठवित सात दिवसात लेखी म्हणणे मांडण्याची मुदत दिली. त्याचबरोबर राज्यातील भाजपाप्रणित सरकार कायम टीकविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट फोडत सरकारमध्ये सहभागी करून घेतला. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदल लवकरच होणार अशी चर्चा सुरु असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?
राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते …
Read More »