Breaking News

Tag Archives: भाजपा

अॅड आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर,…त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्व देत नाही घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातील प्रतिक्रिया देणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचे कौतुक करत भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात …

Read More »

संजय राऊत यांच्यावर त्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल ? पोलिसांकडून तपास सुरु सकाळीच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून नाशिकमध्ये गुन्हा दाखल

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आरोपही करत असतात तर कधी स्वतःवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तरही देतात. बऱ्याचदा ते सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु अशाच एका पत्रकार …

Read More »

काँग्रेसच्या विजयानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आमचं कोणीच… असं समजणाऱ्यांचा पराभव उगाच आता कोणाला धडे शिकवू नका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांची फौज तळ ठोकून होती. तसेच भाजपाला निर्विवाद बहुमत मिळणार, नाही मिळाले तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याच्याही वल्गना करण्यात येत होत्या. मात्र जनतेने या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता काँग्रेसच्या पारड्यात मतांचे दान भरभरून टाकत एकहाती सत्ता …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची मते आहे तशीच, फक्त पाच टक्के मते… वाटलं होतं कल आम्ही तोडू

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांचा धुव्वा उडवत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आमची फक्त ५ टक्के मते …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, चुकीचे वातावरण पसरविणाऱ्यांना धडा… उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार

गेल्या आठ-दहा दिवसांत जाहीर सभांमध्ये मी बोलून दाखवले की कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल. त्यांचे सरकार जरी असले, देशातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा, रोड शो असे कार्यक्रम जरी केले असले तरी तेथील जनतेचा जो रोष आहे तो मतांमधून व्यक्त केला जाईल अशी खात्री आम्हाला होती. तसेच मोदी …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, नफरत की दुकान बंद, प्रेम की दुकान शुरूः ती आश्वासने लगेच… काँग्रेसचा बहुमताचा आकडा पार करताना राहुल गांधी यांची घोषणा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३७ जागांवर आघाडी घेतल्यानंतर देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमवीर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील आनंद व्यक्त करत म्हणाले, नफरत की दुकान बंद प्रेम की दुकान शुरू असे सांगत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जी पाच आश्वासने दिली होती, ती पहिल्या कॅबिनेटमध्ये पूर्ण करू, अशी …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका,…गैरवापर करणाऱ्यांवरच बजरंगबलीनेच गदा फिरवली कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपाला झालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपाच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत …

Read More »

दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट…निकालानंतर नाना पटोले यांची भाजपावर टीका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे भाजपचा सफाया होणार

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि …

Read More »

पराभव नको म्हणून काँग्रेस मध्ये गेलेला नेता आणि विद्यमान १३ मंत्री अखेर पराभूतच भाजपाला ५० हून अधिक जागी पराभव

लोकसभा निवडणूकीला आणखी वर्ष राहिलेला असला तरी देशातील संपूर्ण राजकारणाचा मूड सेट करणाऱ्या कर्नाटक विधानसभेची निवडणूकीचा निकाल आज जाहिर झाला. या निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव करत काँग्रेसने १३६ ठिकाणी विजय मिळवित एकहाती सत्ता हस्तगत केली. निवडणूकीच्या आधीच बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार चांगलेच बदनाम झाले. त्यामुळे भाजपाच्या विद्यमान सरकारमधील …

Read More »

अजित पवार म्हणाले, ….कुणी मनातही आणू नका हे राजीनामा देतील अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आताच्या लोकांची उंची यामध्ये जमिन आस्मानचा फरक

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सरकार स्थापन करण्यासाठीचे मार्ग, राज्यपालांची भूमिका या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत अजित पवारांना विचारलं असता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत …

Read More »