Breaking News

Tag Archives: भाजपा

आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिर प्रवेश नाकारला

एकाबाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करोडो लाखो-रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या राम मंदिरात राम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सकाळपासून अयोध्येत शासकिय राजशिष्टाचाराला डावलून मग्न राहिले. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून पुढे सरकत आहे. परंतु आसाम नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री श्री शंकरदेव …

Read More »

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. भारत जोडो अभियानातर्फे आयोजित जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दाराआड झालेल्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी ही माहिती दिली. १४ जानेवारी रोजी मणिपूर येथून निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्यासाठी ते त्यांना आमंत्रित करत होते. प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नांना …

Read More »

नाना पटोले यांची टीका,… मोदींची गॅरंटी फक्त चाव्या…

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. जेव्हा जेव्हा लोकशाही, संविधान संपवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा या महाराष्ट्राने लोकशाही आणि संविधान मानणा-यांना ताकद दिली आहे. जातीच्या व धर्माच्या नावाने राजकारण करणारा भाजपा संविधान व्यवस्था संपवू पाहत असताना महाराष्ट्रातील जनतेने आज पुन्हा छत्रपती …

Read More »

अतुल लोंढे यांचा टोला, … ते महाराष्ट्र काय चालवणार?

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महाराष्ट्राची अधोगती होत आहे. भाजपा सरकारच्या नाकाखालून मोठे उद्योग राज्याबाहेर जात आहेत, शेतकऱ्यांकडे लक्ष दिले जात नाही, पेपर फुटत आहेत, बेरोजगारी प्रचंड असून नोकर भरती केली जात नाही, १०० पैकी ८८ लोक नोकरी शोधत आहेत. सरकार चालवण्यास भारतीय जनता पक्ष सक्षम नाही. गिरगाव चौपाटीवरच्या लोकमान्य टिळक …

Read More »

सुशिलकुमार शिंदेंच्या त्या वक्तव्यावरून नाना पटोले यांचे भाजपावर टीकास्त्र

सोलापूर शहरातील एका शासकिय कार्यक्रमानिमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची भेट घेत भाजपा प्रवेशाचे आमंत्रण दिल्याची चर्चा आज दुपारपासून सुरु झाली. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत भारतीय जनता …

Read More »

आशिष शेलार यांचा पलटवार, जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर..!!

मुख्यमंत्रीपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता; अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही “महा”खोटं बोलला नसता;रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या “महा” शकुनीला आवरले असते तर अशी “महा” पत्रकार परिषद घेण्याची, नौटंकीची वेळ आली नसती…जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर… अश्या म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर …

Read More »

शरद पवार यांचा मोदींवर हल्लाबोल, गरज शेतकऱ्यांची… कर्जमाफी मात्र उद्योजकांची

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्य विषयावरून लक्ष हटविण्यासाठी भलत्याच प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत देशातील शेतकरी आजही कर्जबाजारी आहे. शेतकऱ्याला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्याची गरज आहे. या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, महायुतीच्या घटकपक्षांची स्थिती गुलामासारखी..

महविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला अंतिम होईल, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, ठाकरे सरकारमुळे …महापालिकेच्या ठेवी घटल्या

ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरांना केलेला ५०% प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाली, असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केला. महायुतीतर्फे आज मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजपा …

Read More »

काँग्रेसची मागणी, मुजोर नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय ? असा प्रश्न विचारून शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांना प्रश्न विचारून हिंदूंचा अपमान करणा-या नारायण राणेंविरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राज्यभर हे आंदोलन करण्यात आले, यावेळी नारायण राणेंविरोधात घोषणा देत त्यांचा …

Read More »