Breaking News

Tag Archives: भाजपा

नाना पटोले यांची टीका, जुमलेबाज भाजपाला असा जुमला दाखवा की… महिला अत्याचार करणारे कौरव व रावणाचे जे झाले तेच भाजपाचेही होणार

भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी भाजपाचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा खर्च कमी करेन, उत्पन्न दुप्पट करेन व पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करेन असे आश्वासन दिले होते. …

Read More »

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला मोर्चा प्रदेश …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केले भाजपा सरकारचा अन्यायी, अत्याचारी कारभार घराघरात पोहचवा

काँग्रेसचे सरकार असताना रेशनवर गहू, तांदूळ, डाळ, डालडा, तेल, साखर मिळत होते पण भाजपाच्या राज्यात रेशनवर धान्यच मिळत नाही. देशात गरीब लोक राहिले नाहीत असे केंद्र सरकार म्हणत आहे. मोदी सरकारने गरीब कुटुंबाला उज्ज्वला गॅस दिला आणि केरोसिन बंद केले, सरकारच्यामते ज्यांच्या घरी गॅस सिलिंडर आहे तो गरीब नाही आणि …

Read More »

पंकजा मुंडे यांची स्पष्टोक्ती, प्रीतमताईंना डावलून मी राजकारणात काम करणार नाही शिव-शक्ती परिक्रमा हे प्रदर्शन नाही तर खरीखुरी शक्तीच ; परिक्रमा पराक्रम ठरणार

मी देणारी आहे, घेणारी नाही. मी प्रीतमला देण्याच्या भूमिकेत आहे, मी तिची आई आहे, बाप आहे, मोठी बहिण आहे. तिला डावलून मी राजकारणात काम करणार नाही. महाराष्ट्रानं, पक्षानं, जगानं समजून घ्यावं, प्रीतम मुंडे उचलून मी स्वःला बसवणार नाही अशा भावना व्यक्त करत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सुरू असलेल्या …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका, नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस…. भाजपाला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला आणा तुम्हाला न्याय देऊ

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची लुट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि …

Read More »

अजित पवार यांचे आव्हान, महायुतीत सहभागी व्हा पत्र खोटं निघालं तर संन्यास घेईन… लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर बीड येथे झालेल्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी बीडऐवजी कोल्हापूरात हसन मुश्रीफ यांनी उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अजित पवार आणि काही लोकांनी वेगळा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आमच्यावर कसला दबाव होता अशी …

Read More »

शरद पवार यांचा नरेंद्र मोदींना सवाल, आता गेट वे इंडियाला काय म्हणायचं? इंडिया-भारत वादावर आणि जी २० परिषदेवरुन साधला निशाणा

मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक संपन्न होत असतानाच केंद्रीतील मोदी सरकारने संसदेचं अधिवेशन बोलवलं. त्यातच जी २० या आंतरराष्ट्रीय नेत्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने मोदी सरकारने अचानक इंडिया या शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामवरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, सरकारला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मात्र आत्महत्यांनी गाठला उच्चांक

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे. एका बातमीचा आधार …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत… भाजपा आणि शिंदे गटावर केली सडकून टीका

शिवसेनेतील फुटीर गटाकडून आणि भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेची काँग्रेस केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २५ वर्षे ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी आतापर्यंत आमची दोस्तीच पाहिली. मात्र आता आमच्या मशालीची धगही सोसा असा गर्भित इशारा भाजपाला देत २५ …

Read More »

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी मान्य

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो …

Read More »