Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस

जयंत पाटील यांची सूचना,… खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत नवाब मलिकांनी समीर वानखेडेवर केलेले आरोप सीबीआय कारवाईनंतर खरे ठरत आहेत...

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची …

Read More »

अशोक टेकवडे यांच्या पक्षांतरावर अजित पवार म्हणाले, ती कारणं त्यांनाच विचारा… मला मिळालेली माहिती वेगळीच आहे

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा पहायला मिळत आहे. यासंदर्भात महाविका आघाडीतील तिन्ही पक्षांकडून चर्चा सुरू करण्यात आली असली, तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपामध्ये करण्याचा निर्णय …

Read More »

राज ठाकरेंच्या बोध घ्यावा वर देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडूण येण्याचा रेट चांगला… जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज मंडळी ठाण मांडून बसली होती. मात्र काँग्रेसला एकहाती सत्ता मिळविण्यापासून कोणी रोखू शकलं नाही. काँग्रेसला कर्नाटकात १३६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाणारे महत्वाचं राज्य भाजपाला गमावावे लागलं. या पराभवावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी …

Read More »

जयंत पाटील यांची माहिती, मविआ नेत्यांच्या बैठकीत या गोष्टींवर झाला निर्णय… महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा पुन्हा सुरू- महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, चुकीचे वातावरण पसरविणाऱ्यांना धडा… उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार

गेल्या आठ-दहा दिवसांत जाहीर सभांमध्ये मी बोलून दाखवले की कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल. त्यांचे सरकार जरी असले, देशातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा, रोड शो असे कार्यक्रम जरी केले असले तरी तेथील जनतेचा जो रोष आहे तो मतांमधून व्यक्त केला जाईल अशी खात्री आम्हाला होती. तसेच मोदी …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका,…गैरवापर करणाऱ्यांवरच बजरंगबलीनेच गदा फिरवली कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपाला झालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपाच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, अजित पवार खोटे बोलतायत… आदेश आल्यानंतर मी, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात तिघे भेटलो

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं. नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनाम्याची माहिती दिली, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले. प्रतोद नेमण्यापासून …

Read More »

सुषमा अंधारे म्हणाले,…अजित पवार एकटेच विरोधी पक्षातील नेते आहेत का? मी तर अजित पवारांचे नावंही घेतले नाही

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांनी विधिमंडळात त्यांच्यावरील अश्लाघ्य वक्तव्यावर प्रश्न विचारला नाही, अशी तक्रार केली. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडा, असं म्हटलं. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या, तो …

Read More »

अजित पवार म्हणाले, ….कुणी मनातही आणू नका हे राजीनामा देतील अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आताच्या लोकांची उंची यामध्ये जमिन आस्मानचा फरक

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सरकार स्थापन करण्यासाठीचे मार्ग, राज्यपालांची भूमिका या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत अजित पवारांना विचारलं असता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत …

Read More »