Breaking News

Tag Archives: विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, समृध्दीसाठी वर्षातच २४०० कोटी पुन्हा निविदा ?

राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना २०१४ साली माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फायद्यात असणाऱ्या एसआरए आणि म्हाडाच्या ठेव रकमेतील पैशांचा आणि बँकांकडून ५० हजार कोटींचे कर्ज उभारत मुंबई ते नागपूर असा ८०० किमीहून अधिक लांब असलेल्या समृध्दी महामार्गाची उभारणी केली. तसेच या महामार्गासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनी तत्कालीन नगरविकास …

Read More »

अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सभागृहातच धरले धारेवर, …चुकीची माहिती दिली…

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. मागील दोन दिवसांपासून अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसकल्पावरील घोषणांवर आणि आर्थिक तरतूदींवर विधानसभेत सर्वपक्षिय आमदारांकडून चर्चा करण्यात आली. या चर्चेला आज अर्थमंत्री अजित पवार हे उत्तर देत असताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पिय खर्चातील आकडेवारीवरून अजित पवार …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर अजित पवार स्पष्टोक्ती, सोडणार नाही कोणाला

नुकतेच मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्याखोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर याप्रकरणी मरिन लाईन्स पोलिस स्थानकात मुख्यमंत्री सचिवालयाने गुन्हाही दाखल केला. याप्रश्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना होतात हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून करण्यात आली आहे. या उमेदवारांना मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने ते दोन दिवसापासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत, या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, ते तर साधे गावकरी, एका बॅनरची इतकी काय भीती

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील जाहिर कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा २ रा आणि ३ रा निधीचे वाटपही करण्यात येणार आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी १० वर्षापूर्वी दिलेले आश्वासन …

Read More »

आशिष शेलार यांच्या मागणीवर विधानसभाध्यक्षांचे आदेश, जरांगे पाटीलांची एसआयटी चौकशी करा

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न रखडण्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आंदोलक फुटत नसल्याने आपल्यावर विष प्रय़ोग आणि एन्कांऊटर कऱण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोपही केला. तसेच त्यानंतर माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र बेचिराख होई …

Read More »

विजय वडेट्टीवारांनी आशा सेविकांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करताच अजित पवार म्हणाले…

आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. विधानसभा सभागृहात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कामकाज सुरु होताच पुरवणी मागण्या मांडण्यास सुरुवात केली. परंतु त्याचवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मध्येच मागील दिड महिन्यापासून राज्यातील आशा सेविकांकडून मानधनवाढीच्या मुद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर काहीशा चिडलेल्या अजित पवार …

Read More »

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी…

सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचे सूचक वक्तव्य, एखादा आंदोलक असे आरोप करत असेल तर…

अंतरावली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु केले. परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अजय बावसकर यांनी जरांगे पाटील यांच्यापासून वेगळं होत मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपध्दतीवरच आरोप करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, … सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का?

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले …

Read More »