शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षांतरबंदी कायदा आणि आमदार अपात्रतेचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. सुनावणीनंतर न्यायालयाने संबधित यंत्रणेवर ताशेरे ओढत बंडखोर आमदारांच्या अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घ्यावा असे सांगितल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी करत प्रत्येक वेळी आम्ही …
Read More »विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण
राज्याच्या राजकीय वर्तुळात महत्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लवकरच लागला जाणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहे. अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून याबाबत दिरंगाई होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया… निकालाची कागदपत्रे हाती आल्यानंतर बोलेन
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासंबधी वेळेची मर्यादा दिलेली नाही याचा अर्थ न्यायालयाचा अवमान करणे असा होत नाही अशा कडक शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावलं आहे यावर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही विधानसभा …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची नाराजीः विधानसभाध्यक्षांनी दोन आठवड्यात निर्णय घ्यावा शिवसेना अपात्रतेच्या निर्णयावर राहुल नार्वेकर यांना फटकारले
राज्यातील सत्तासंघर्षावरील आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष नावासह चिन्ह या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीच कारवाई केली नसल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यात आमदार अपात्रतेच्याबाबत निर्णय घेऊन त्याबाबतची सगळी प्रक्रिया न्यायालयास सांगावी असे …
Read More »आम्ही आरक्षण दिलं तरी ते कायद्याच्या चौकटीवर टीकलं पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तर, दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वक्तव्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो. सर्वोच्च …
Read More »लाठीचार्जच्या आरोपांवरून ठाकरे-सरकारमध्ये आव्हान प्रतिआव्हान अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, ...तर आम्ही तिघेही राजकारण सोडू
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगला आहे. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) राजकारण सोडू असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात …
Read More »‘आम्हीच शिवसेना’ शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराचे ६५०० हजार पानाचे जबाब शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना सादर
राज्यातील शिवसेनेच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्या संदर्भातील अंतिम निकाल देण्याचे सर्वाधिकार राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षांना दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत आणि सोयीनुसार विधानसभा अध्यक्षांनी फक्त शिंदे गटाच्या ४० आमदारांच्या दाव्यावर निर्णय घेणे अपेक्षित असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या ५६ …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, १६-१८ वर्षे वयोगटातील मुलां मुलींमधील लैंगिक संबध गुन्हेगारीचे? न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा
१६-१८ वर्षे वयोगटातील संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचा प्रतिसाद मागितला. शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १६ ते १८ वयात संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणाऱ्या वैधानिक …
Read More »सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे अपील, …खोडकरपणा समाज माध्यमात फिरत असलेल्या पोस्टवरून सरन्यायाधीशांचे अपील
मागील काही वर्षापासून केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई, बेरोजगारी, इंधनाचे वाढते दर, धार्मिक-वाशिंक दंगे आदीबरोबर मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या विरोधातही राजकिय आणि सामाजिक स्तरावर असंतोष वाढताना दिसत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावे एक मेसेज समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून या मेसेजद्वारे लोकांना रस्त्यावर …
Read More »अखेर ईडीने विरोध न केल्याने नवाब मलिक यांना मिळाला जामीन सर्वोच्च न्यायालाने केला जामीन मंजूर
भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज व्यापारातील गुन्हेगारांशी संबध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहिण असलेल्या हसिना पारकर हिच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी कुर्ला येथील गोववाला कंपाऊड येथील मालमत्ता स्वस्तात खरेदी केल्याचा आणि या मालमत्ता खरेदीतील पैसा …
Read More »