Breaking News

Tag Archives: डॉ बाबासाहेब आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, एक राष्ट्र एक निवडणूक भारताला हुकूमशाही… निवडणूकीबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा दिला दाखला

देशात एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या या प्रस्तावावरून सर्वच प्रमुख विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भाषणाचा संदर्भ देत भाजपाने हुकूमशाहीच्या दृष्टीने टाकलेल्या अनेक पायऱ्यांपैकी …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकातील हा पुतळा भव्य असल्याने त्यासाठी वेळ लागत आहे. स्मारकाचे हे संपूर्ण काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

डॉ आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा स्थापनादिन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहणार

महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब दलित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचा ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ७९ वा वर्धापन दिन सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला …

Read More »

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळ बीआयटी वसाहतीत प्रवेशद्वार उभारा मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांचीमहापालिका आयुक्तांकडे मागणी

परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत पोहचताना अनुयायी तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वास्तूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक स्वरुपात विकसित करुन दोन्ही बाजूस डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज मुंबई भाजपा …

Read More »

डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या भगेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील यांची मागणी

मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीः लोकशाहीला असलेले धोके विसरत आहोत का? सध्या देशात निवडणूकांचे वातावरण असल्याने राज्यघटना आणि लोकशाही यासंदर्भात देशात राजकिय आरोप प्रत्यारोप वाढत आहेत.

देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत ह्या देशाला बांधून ठेवणारी राज्यघटना कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचा मसुदा तयार करण्यासाठी तेव्हाच्या संसदेतील लोकप्रतिनिधींनी ९ डिसेंबर १९४६ साली संसदेची अर्थात कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी अगणित चर्चा, वाद विवाद, नवी विधेयक सादर करत तर आहे …

Read More »

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० वर्षे आधी डॉ बाबासाहेब आंबेडकरकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रूपी हा प्रबंध एमएससी या अर्थशास्त्रातील पदवीसाठी लिहून तो लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात सादर केला होता. याच प्रबंधाच्या आधारे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासाठी मध्यवर्ती …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतूनच रिझर्व्ह बँकेची स्थापना

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लम ऑफ द रूपी हा प्रबंध लिहून भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना सर्व बँक आणि आर्थिक संस्थांचे संचालन नियंत्रण करणारी मध्यवर्ती राष्ट्रीय स्तरावर बँक असावी अशी संकल्पना शंभर वर्षांपूर्वी मांडली होती. त्या संकल्पनेनुसार १ एप्रिल १९३४ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची …

Read More »

मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या चैत्यभूमीवर

मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली त्यानंतर कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रम नियोजनाचा आढावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२४ रोजी १३३ वी जयंती असून चैत्यभूमी, दादर आणि दीक्षाभूमी, नागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे …

Read More »