Breaking News

Tag Archives: ajit pawar

पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी पुतण्याकडून शरद पवारांची हिट विकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र

वर्धाः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी सध्या कौटुंबिक लढाई सुरु असून शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार यांची हिट विकेट होणार असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने वर्धा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींकडून पवारसाहेब व राष्ट्रवादी टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी वर्धा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवारसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. शरद पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत. परंतु देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले हे जगजाहीर आहे. मात्र …

Read More »

शिवसेना उपनेते डॉ.अमोल कोल्हेंच्या हातात आता राष्ट्रवादीचे घड्याळ अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी स्वराज्यरक्षक संभाजी या दूरचित्रवाहीनी मालिकेमुळे आणि ऐतिहासिक नाटकामुळे राज्यात लोकप्रिय झालेले शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील विरोधी …

Read More »

मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची व समविचारी पक्षांची महाआघाडीबाबत चर्चा झाली आहे. शेवटची बैठक कॉग्रेसचे नेते खर्गे यांच्यासोबत होणार असून आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादी …

Read More »

या दळभद्री सरकारला उलथवून टाका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका कोल्हापूर – कागल: प्रतिनिधी लाखांचा पोशिंदा सुखी नाही… आया बहिणी सुरक्षित नाहीत… कुपोषणाने डोके वर काढले आहे… अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे असलं दळभद्री सरकार असून याला उलथवून टाका अशी जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी कागलच्या जाहीर सभेत केली. १५ …

Read More »

… तर मंत्र्यांना दावणीला बांधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे आवाहन जालना – घनसावंगी : प्रतिनिधी दुष्काळी भागातील जनावरांच्या छारा छावण्यांना द्यायला पैसै सरकारकडे नाहीत. जनावरं मेल्यावर पैसे देणार का? असा सवाल करतानाच या सरकारकडे पैसै नसतील आणि जर सरकारचे मंत्री देतो सांगण्यासाठी येत असतील तर त्या मंत्र्यांना दावणीला बांधा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

देशातील बँक लुटून गेलेले लोक अद्याप चौकीदाराला सापडले नाहीत

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका औरंगाबाद – कन्नड : प्रतिनिधी या भाजपचे सरकार आल्यावर बँकांवर दरोडे घालून दिवसाढवळया काही लोक निघून गेले. परंतु ते दरोडेखोर चौकीदाराला अद्याप सापडले नसल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निर्धार यात्रा कन्नड येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर …

Read More »

सरकारला काम करण्याची अक्कल नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका बुलढाणा- वरवटबकाल: प्रतिनिधी हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवतेय… तुमच्या नोकर्‍या घालवतंय… आधारभूत किंमत देत नाहीय… कापसाला दर नाही… तांदुळ, तूरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी विचारणा जनतेला करतानाच विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला चांगलेच खडसावले.  …

Read More »

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱी आत्महत्या करतायत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची राज्य सरकारवर टीका  जळगाव – चोपडा: प्रतिनिधी या सरकारच्या नाकर्तेपणा मुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी करत लोकांचे विकासाचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे पैसा नाही. परंतु यांच्या घोषणा करण्याचं काम सुरुच आहे. गरीब गरीब होत चालला आहे आणि …

Read More »

वाढत्या महागाईमुळे पिशवीतून पैसे आणि खिशातून सामान आणावे लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सरकारवर उपरोधिक टीका जळगाव -चाळीसगावः प्रतिनिधी आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील अशी उपरोधिक टीकामाजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील …

Read More »