काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात सातत्याने अतिमुसळधार पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती दयनीय बनली. त्यातच अनेक गावं वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक आपत्तीने बाधित गावांबाबत धोरण निश्चित कऱणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचे धोरण निश्चित केले. …
Read More »श्रीकांत शिंदे म्हणाले, ये तो केवल झाँकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है विरोधकांना सध्या एकनाथ शिंदे स्वप्नातही दिसतात
राज्यात भाजपाच्या पाठिंब्याने शिवसेनेत फुट पाडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. त्यानंतर सत्ताधारी विरूध्द विरोधक अर्थात महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात पहायला मिळत आहे. तसेच हा संघर्ष तीव्र होताना शिवसेना विरुद्ध शिंदे गट, शिवसेना विरुद्ध भाजपा, काँग्रेस विरुद्ध भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असे …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहिल्यास दिड हजार रूपये… जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मुंबईत …
Read More »सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कारावरून जयंत पाटील यांनी टोचले मुख्यमंत्र्यांचे कान सरकार वैधतेची गंभीर सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीशांसोबत बसणे संकेतांना धरुन नाही
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले यु.यु.लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुरुवातीला राजभवनावर होणारा सत्कार सोहळा ऐनवेळी ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि न्यायपालिकेच्या या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राच्या सुपुत्रांची नियुक्ती झाली. मात्र ते निवृत्त होण्यापूर्वी कोणाचा राज्य …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन, नागरिकांनो तक्रारी अर्ज मुख्यमंत्री कार्यालयात सादर करा ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करा
ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनी देखील आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावे, असे आवाहन …
Read More »राज्यपाल कोश्यारी आणि शिंदे सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल शिंदे सरकारच्या निर्णयाची तपासणी करा आणि राज्यपालांच्या कारभाराविषयी नियमावली करण्याची मागणी
राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला उलथवून टाकत शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार भाजपाच्या पाठिंब्यावर स्थानापन्न झाले. मात्र या सरकारला कायदेशीर मान्यता आणि एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असल्याने या सरकारच्या निर्णयाची तपासणी करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करावी तसेच राज्यपालांच्या निर्णय क्षमतेसंदर्भात कालावधी निश्चित …
Read More »जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, …आता राज्य करायला उसंत मिळेल भेट देण्याच्या उपक्रमावरून लगावला टोला
सर्व गणपतींना भेट देण्याचा उपक्रम आता बाप्पाच्या जाण्यानंतर महाराष्ट्रात पूर्ण होणार असून आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल असा टोला लगावतानाच राज्यात संकटात असलेल्या बळीराजाला मदत करायला हात सरसावतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या घरगुती गणेशाचे आज विसर्जन …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज… व्हॉटस्ॲप मेसेजचा निरोप सांगून खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ठेवले बोट...
राज्यात गणपती आणि अनेक सण होत राहतील, त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून मायबाप जनतेची सेवा करतील असा निरोप व्हॉटस्ॲप मेसेजवरून मिळाला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बोट ठेवले. घाटकोपर येथे गणपती दर्शन घेत असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर …
Read More »शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार कधी ? बंडखोर आमदारांमध्ये उत्सुकता
राज्यातील सत्ता संघर्ष नाट्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत विराजमान झाले. त्यानंतर जवळपास ४० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला यामध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजीनाट्य पाहायली मिळाले. त्यामुळे आता दुसरा विस्तार कधी याची याकडे सामान्य जनतेपेक्षा फुटीर गटातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या आमदारांना आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी …
Read More »राज्यात गुड गर्व्हनन्ससाठी मुख्यमंत्री शिंदेकडून माजी सचिवांची टीम सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी प्रशासनाचे व्हावे सुशासन...!
राज्यातील गुड गर्व्हनन्स अर्थात सुशासन आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिवांची एक टीम तयार करण्यात येणार आहे. ही टीम गुड गर्व्हनन्स निर्माण करण्यासाठी नव्याने नियमावली तयार करेल. त्यासाठी या समितीत राज्याच्या सहा माजी मुख्य सचिवांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात …
Read More »