Tag Archives: devendra fadnavis

सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया, शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात…. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन, रामनमवीचा कार्यक्रम पार पाडावा तणाव निर्माण होईल असे वक्तव्य कोणी करू नका

काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरममध्ये दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही पाह्यला मिळाले. यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या राड्याप्रकरणी शिंदे गटाबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर आरोप केले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांना टोला, त्यांना जनता सांभाळता येत नाही फक्त… महाविकास आघाडीच्या मेळाव्यात विग्न आणण्याचा प्रयत्न

काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. यामध्ये समाजकंटकांनी पोलिसांची आणि नागरिकांची वाहने जाळली. तसेच अनेक वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्याच्या घटनाही शहरातील किराडपुरा भागात घडली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री …

Read More »

नाना पटोले यांचा टीका,…शिंदे-फडणवीस सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त …

Read More »

त्या टीपण्णीनंतर संजय राऊत यांची टीका, या सरकारची पत काय? बिनकामाचं आणि नपुसंक सरकार मी नाही तर आता न्यायालय आणि जनताही म्हणतेय

मागील काही दिवसात राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत एका विशिष्ट जनसमुदायाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार हे नपुंसकासारख वागतंय, वेळेवर पाऊले उचलत नसल्याची टीपण्णी केली. या टीपण्णीवरून ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

पर्यटन ठिकाणांच्या यादीत आता गोसीखुर्दचा समावेशः सामंजस्य कराराच्या निमित्ताने शिक्कामोर्तब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी संधी असून या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ …

Read More »

महिलेच्या मृत्यूनंतर शिंदे सरकारला आली जाग, नागरिकांसाठी वेळा राखून ठेवण्याचे दिले आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व अधिकारी-मंत्र्यांनाही केल्या सूचना

हिंदूत्ववादी आणि सावरकरवादी प्रेमात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या व्यस्ततेमुळे काल तीन व्यक्तींनी मंत्रालयाच्या परिसरात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एका अपंगाचा तर दोन महिलांचा समावेश होता. परंतु यातील एका महिलेचे आज उपचारा दरम्यान निधन झाल्याची माहिती बाहेर आली. त्यानंतर हिंदूत्ववादी आणि सावकरवादाच्या प्रेमात आखंड बुडालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला अखेर काही काळासाठी का …

Read More »

स्वा.सावरकरांच्या प्रेमापायी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर, मात्र न्यायासाठी ३ चा मंत्रालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न काल दिवसभरात एक अपंगासह दोन महिलांचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न अखेर एकीची प्राण ज्योत मालवली

राज्यात सध्या सावकरप्रेमी आणि हिंदूत्ववादी विचारसरणीचे सरकार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र ज्या हिंदूत्ववाद्यांचे सरकार असल्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येतो त्याच हिंदू धर्मिय तीन व्यक्तींकडून आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयासमोर काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एका महिलेचा …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा सवाल, म्हणजे नेमके काय करणार? सावरकरांचा अपमान झाल्या तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प

काल मालेगांव येथे झालेल्या जाहिर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वा.सावरकर प्रश्नावरून इशारा दिला. त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांचा फोटो दाखवत उध्दव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प होते, …

Read More »

जयंत पाटील यांनी सांगितले महाविकास आघाडीच्या विजयाचे रहस्य, भाजपाची खरी ताकद… निष्ठावान शिवसैनिक भाजपा विरोधात

शिवसेना भाजपासोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपाला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपाची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपाने केले. त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपाविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपाला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »