Marathi e-Batmya

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर

मराठी ई-बातम्या टीम

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने २०२०-२१ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, एकूण ११.०१ लाख दावे कंपन्यांना वैयक्तिक जीवन विमा प्रकरणी प्राप्त झाली होती. यापैकी आयुर्विमा कंपन्यांनी १०.८४ लाख दावे भरले. या दाव्यांची रक्कम २६,४२२ कोटी रुपये होती. स्पष्टीकरण मिळाल्यानंतर ९५२७ दावे फेटाळण्यात आले. त्याची रक्कम ८६५ कोटी रुपये होती. तर ३,०३२ दावे पूर्णपणे फेटाळण्यात आले. त्याची रक्कम ६० कोटी होती. वर्षाच्या अखेरीस प्रलंबित दावे ३,०५५ होते. त्यांची एकूण रक्कम ६२३ कोटी रुपये होती.

३१ मार्च २०२१ रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा क्लेम सेटलमेंट रेशो ९८.६२ टक्के होता. ३१ मार्च २०२० रोजी हा रेशो ९६.६९ टक्के इतके होते. फेटाळलेल्या दाव्यांचे प्रमाण २०२०-२१ मध्ये १.०९ टक्क्यांवरून १ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. खाजगी विमा कंपन्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो २०२०-२१ मध्ये ९७.०२ टक्के होते (२०१९-२० मध्ये ९७.१८ टक्के) आणि २०२०-२१ मध्ये रिजेक्ट रेशो २.५० टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत घसरला.

IRDAI च्या वार्षिक अहवालात असे नमूद केले आहे की २०२०-२१ मध्ये जीवन विमा उद्योगाचे सेटलमेंट रेशो ९८.३९  टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०१९-२० मध्ये ९६.७६ टक्के आणि नाकारण्याचे प्रमाण १.२८ टक्क्यांवरून १.१४ टक्क्यांपर्यंत कमी झाले. IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना जीवन विमा दावे लवकरात लवकर निकाली काढण्याचा सल्ला दिला आहे.

विमा पॉलिसी खरेदी करताना जीवन विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो हा महत्त्वाचा घटक आहे. प्रलंबित दाव्यांसह विमा कंपनीने निकाली काढलेल्या जीवन विमा दाव्याची टक्केवारी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो.  सेटलमेंट रेशो प्रत्येक १०० विमा कंपन्यांपैकी किती दावे भरले आहेत हे सांगते. जर क्लेम सेटलमेंट रेशो ९० टक्के असेल, तर विमा कंपनीने १०० पैकी ९० दाव्यांची भरपाई केली आहे आणि इतर १० दाव्यांची रक्कम निर्धारित वेळेत भरली गेली नाही हे दर्शविते. एका चांगल्या विमा कंपनीने सर्व पात्र दावे लवकरात लवकर निकाली काढले पाहिजे. या अशा विमा कंपन्या आहेत ज्यांनी दाव्यांची योग्य पूर्तता केली आहे, मात्र हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की दावा स्वीकारण्यात आणि निकाली काढण्यात किंवा उच्च गुणोत्तर राखण्यासाठी विमा कंपनीचा आकार देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

Exit mobile version