Marathi e-Batmya

…. आता खैर नाही

 मुंबई : प्रतिनिधी

  इटलीअमेरिकास्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरपॅरामेडिकल स्टाफपोलिससफाई कामगारयासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावंअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांचीनियम मोडणाऱ्यांची आता खैर नाहीअसा इशाराही त्यांनी दिला आहे. 

राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदीचा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतीलअसा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागवैद्यकिय शिक्षण विभागपोलिस विभागनगरविकास विभागग्रामविकास विभागमहसुल विभागअन्न व नागरी पुरवठाअन्न व औषध प्रशासनस्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत असलेल्याचं त्यांनी आभार मानले.  

बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांचीनियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.          

Exit mobile version