मुंबई: प्रतिनिधी
३ मे नंतर जर लॉकडाऊन वाढल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्याच्या उद्देशाने कुडाळमधून बाहेर परराज्यात, परदेशात आणि आपल्या मूळ गावी जावू इच्छिणाऱ्या व्यक्तींची माहिती जमा करण्यासाठी ते आदेश जारी करण्यात आले. मात्र ते कार्यालयीन कामकाजासाठी असलेले पत्र बाहेर आल्याने सदरचे ते पत्र रद्द करण्यात आल्याचा कुडाळच्या तहसीलदारांकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुढील शासन आदेश जारी होईपर्यत कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
