बिहारच्या पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना दिल्लीत एका पत्रकार परिषदेदरम्यान एका व्यक्तीने चप्पल फेकल्याने लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि त्यांचे समर्थक व हल्लेखोर यांच्यात झटापट झाली. मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिरासाठी असलेल्या देणग्यांच्या चोरीशी संबंधित कायद्यावर यादव यांनी केलेल्या वक्तव्याशी हा निषेध संबंधित होता. चप्पल फेकल्यानंतर यादव यांचे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर द्यावा रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’ चे उद्घाटन
शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची गरज नाही, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केले. रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’च्या उद्घाटन …
Read More »नीट पेपरफुटीनंतर एनटीए पेपरच्या सुरक्षिततेसाठी ७.५ कोटी रूपयांची निविदा २४ तास पेपर सुरक्षेसाठी निविदा, १५ लाख रूपये भरून निविदा भरता येणार
नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणानंतर आपल्या परीक्षा प्रणालीची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी एक मोठे पाऊल म्हणून, राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) आपले मुख्यालय, प्रादेशिक कार्यालये आणि इतर संवेदनशील ठिकाणी २४x७ सुरक्षा सेवा पुरवण्यासाठी एका व्यावसायिक संस्थेची नियुक्ती करण्याकरिता सुमारे ७.५ कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. आपल्या परीक्षा प्रणालीची अखंडता अधिक मजबूत …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधान मोदी चांगला कारभार करतायत तर विवेक ओबेरॉय, आर माधवन दुबईत का? मोदींवर चित्रपट काढणारे विवेक ओबेरॉय आणि आर माधवन दुबईचे नागरिक
ज्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चित्रपट काढला ते अभिनेते विवेक ओबेरॉय आणि दुसरे चित्रपट अभिनेते आर. माधवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला पुन्हा महान बनवत आहेत असा विश्वास असूनही हे दोन्ही अभिनेत्यांनी दुबईचे नागरिकत्व घेत तिकडेच राहण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. शनिवारी …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती, अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, टोलनाक्यावरील भ्रष्ट कारभार, दादागिरी व फास्टॅग मधून दुप्पट वसूलीला आळा घाला टोल नाक्यावर मारहाणीचे प्रकार
राज्यातील प्रमुख महामार्गावरील टोलवसुली ही वाहन चालक व मालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. टोलवसुली वरून अनेक टोलनाक्यांवर मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. महाराष्ट्रातील काही टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’ स्कॅनर्स मध्ये बिघाड आहे, टोलची चुकीच्या पद्धतीने दुप्पट कपात केली जात आहे, तर अनेक टोलनाक्यांवर अनधिकृत ‘फास्टॅग’ एजंट्सकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत. याबाबत तक्रारी करण्यात आल्या पण टोल नाक्यांवरील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत …
Read More »कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक महसूल विभागाकडून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश
आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या प्रकरणांचा कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत निपटारा होणे बंधनकारक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. …
Read More »राज्यातील शैक्षणिक प्रवेशासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ‘वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्रा’ची अट नाही शाळा सोडल्याचा दाखला, धर्मप्रमुखाचे प्रमाणपत्र किंवा पालकांचे शपथपत्र प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचे प्रशासनाचे स्पष्ट निर्देश
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राची/दाखल्याची सक्ती केली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. शासन निर्णयानुसार विहित केलेले पुरावे ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्याचे आवाहन विभागाने केले आहे. महाराष्ट्र शासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन आणि ज्यु या ७ लोकसमूहांना “अल्पसंख्याक लोकसमूह” म्हणून …
Read More »
Marathi e-Batmya