मुंबई: प्रतिनिधी
देशातील १३० कोटी लोकांचे खाजगी माहिती धोक्यात असल्याचे सांगत चीनी ५९ मोबाईल अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र ज्या नमो Namo अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खाजगी माहिती परदेशात पाठविली जाते. त्या अॅपवर बंदी कधी घालणार असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.
नमो अॅपवरून डाऊनकर्त्याची माहिती परस्पर परदेशातील कंपन्यांना पाठविली जाते. तसेच त्याच्या मोबाईलमधील सेटींगही बदलली जात असल्याचे सांगत या अॅपवरही बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली.
चीनी अॅपवर बंदी घातली मात्र नमो अॅपचे काय?
