Marathi e-Batmya

प्लास्टिक बंद करणारे नकली पर्यावरणप्रेमी आरेप्रकरणी कुठे गेले?

मुंबईः प्रतिनिधी
आरेत वृक्षतोड होत असताना प्लास्टिक बंद करणारे नकली पर्यावरणप्रेमी कुठे गेले?असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करत ही वृक्षतोड म्हणजे मुंबईकरांना नाक दाबून मारण्याचा प्रकार असल्याची टीका केली.
गेली २५ वर्षे शिवसेना जीव घेत होती. आता भाजपसोबत युती करून सामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहे असा थेट आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version