Marathi e-Batmya

१४ मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७० टक्के मतदान

मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.७० टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. तर सर्वाधिक मतदान कोल्हापूरात झाले आल्याचे त्यांनी सांगितले.
१४ लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव ३३.१२ टक्के, रावेर ३५.१५ टक्के, जालना ३७.९१ टक्के, औरंगाबाद ३५.४२ टक्के, रायगड ३८.७४ टक्के, पुणे २७.१७ टक्के, बारामती ३५.५८ टक्के, अहमदनगर ३४.७३ टक्के, माढा ३३.४१ टक्के, सांगली ३४.५६ टक्के, सातारा ३४.८४ टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ३९.९३ टक्के, कोल्हापूर ४२.०४ टक्के, हातकणंगले ३९.६८ टक्के.

Exit mobile version