दुपारी १ वाजेपर्यंत ३० तर ३ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.१९ टक्के तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४६. १३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. वर्धा ३०.२२ %, रामटेक (अ.जा.) २३.१९%, नागपूर २७.४७%, भंडारा-गोंदिया ३२.०२%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ४१.८७%, चंद्रपूर ३०.५०% आणि यवतमाळ-वाशिम २६.०९% मतदान झाले.
दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान
पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा ४३.९०%, रामटेक (अ.जा.) ४४.५०%, नागपूर ४१.२५%, भंडारा-गोंदिया ४९.०५%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ५७%, चंद्रपूर ४६.३०% आणि यवतमाळ-वाशिम ४३.३५% टक्के मतदान झाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा ‘विकसित महाराष्ट्र’ अंतर्गत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट

‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ पर्यंत एसटी महामंडळामध्ये सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के; तर २०४७ पर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *