Marathi e-Batmya

केरळमधील जनतेसाठी भाजपा-एनडीएकडून ओनम आणि ख्रिसमससाठी दोन सिलिंडर मोफत

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय टेनिस दिग्गज लिएंडर पेस यांनी मंगळवारी (३१ मार्च, २०२६) भाजपमध्ये प्रवेश केला, असे पक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लिएंडर पेस यांनी पक्षात प्रवेश केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (३१ मार्च, २०२६) आरोप केला की, केरळमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एलडीएफने विजय मिळवावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे.

कन्नूर येथील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना, राहुल गांधी यांनी आपला आरोप पुन्हा एकदा केला की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) ही डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भाजपाच्या संयुक्त शक्तींशी लढत आहे.

यूडीएफच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे सीपीआय(एम)चे दोन माजी नेते — व्ही. कुन्हीकृष्णन आणि टी. के. गोविंदन् — हे देखील मंचावर उपस्थित होते.

“ही निवडणूक दोन विचारधारांमधील लढाई आहे — सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील डावी आघाडी आणि यूडीएफ. पहिल्यांदाच आपण भाजप आणि डावी आघाडी यांच्यातील भागीदारी पाहत आहोत,” असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीतील ठळक घडामोडी: आसाममध्ये भाजपा-एनडीएच्या हॅटट्रिकसाठी सर्वजण कठोर परिश्रम करत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यापूर्वी ३१ मार्च २०२६ रोजी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात भूमी, वारसा आणि स्थानिक लोकांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण तसेच ५ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा गुंतवणुकीचे आश्वासन दिले आहे. भाजपच्या ‘संकल्प पत्रा’मध्ये ३१ आश्वासने आहेत, ज्यात बांग्लादेशी मियांकडून अतिक्रमित जमीन परत मिळवणे, समान नागरी संहिता लागू करणे, राज्याचा विकास आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.

एनडीएने ‘विकासित केरळम’ जाहीरनामा सादर केला: दरवर्षी दोन मोफत एलपीजी सिलिंडर, सामाजिक सुरक्षा पेन्शन, एम्स, हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क यांसारख्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांचा यात समावेश आहे.

भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मंगळवारी आपला ‘विकासित केरळम व्हिजन’ जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत परिवर्तन घडवण्यासाठी आमूलाग्र रोजगार क्रांती आणि “कामगिरीचे राजकारण” करण्याची आश्वासने दिली आहेत.

या दस्तऐवजात राज्याच्या पहिल्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (एम्स) बहुप्रतिक्षित स्थापनेचे वचन दिले आहे. आणखी एक मोठे आश्वासन म्हणजे तिरुवनंतपुरम आणि कन्नूरला जोडणाऱ्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा विकास करणे. ताशी २०० किमी कमाल वेगासाठी याची रचना करण्यात आली असून, उत्तर-दक्षिण प्रवासाचा वेळ केवळ ३ तास ​​१५ मिनिटांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रस्तावित प्रकल्पाला भारताचा पहिला ‘संपूर्णपणे हरित रेल्वे प्रकल्प’ म्हणून ओळखले जात आहे आणि भूसंपादन कमी करण्यासाठी याच्या ९०% लांबीसाठी उन्नत किंवा बोगद्यातील मार्गाचा वापर केला जाईल.

एनडीएने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी कल्याणकारी योजनांचेही आश्वासन दिले आहे, ज्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांतील महिलांसाठी ‘भक्ष्य आरोग्य सुरक्षा कार्ड’ सुरू करण्याचा समावेश आहे, ज्याद्वारे किराणा आणि औषधांसाठी दरमहा ₹२,५०० चा रिचार्ज मिळेल. इतर कल्याणकारी आश्वासनांमध्ये प्रत्येक कुटुंबाला दरमहा २०,००० लिटर मोफत पाणी, ओणम आणि ख्रिसमसच्या काळात दरवर्षी दोन मोफत एलपीजी सिलिंडर आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व विधवांसाठी सामाजिक सुरक्षा पेन्शन दरमहा ₹३,००० पर्यंत वाढवण्याचा समावेश आहे.

राहुल गांधी यांनी दिला मोठ्या आर्थिक भूकंपाचा दिला इशारा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी एका मोठ्या ‘आर्थिक भूकंपा’चा इशारा दिला. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे इंधनाच्या किमती आणि महागाईत संभाव्य वाढ होईल, ज्याचा थेट परिणाम येत्या काही महिन्यांत भारतातील लोकांना जाणवेल, असा स्पष्ट इशाराही यावेळी दिला.

आज कोझिकोड येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आखाती प्रदेशात घडणारी परिस्थिती ही एक ‘दुर्दैवी घटना’ आहे, ज्याचे परिणाम अनिश्चित आहेत. मात्र, त्याचे पडसाद केरळ आणि संपूर्ण भारतातील लोकांवर थेट परिणाम करतील, असा इशाराही दिला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, वाढत्या जागतिक अस्थिरतेचे लवकरच देशांतर्गत आर्थिक संकटात रूपांतर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी पुढे दिला. “मध्यपूर्वेत काय घडत आहे हे तुम्हाला माहीत आहे… एक दुर्दैवी घटना घडत आहे आणि तिचा शेवट कुठे होईल हे कोणालाच माहीत नाही. केरळ आणि भारतातील लोकांवर याचा थेट परिणाम होईल. इंधनाच्या किमती वाढणार आहेत. महागाई वाढणार आहे. एक भूकंप, एक आर्थिक भूकंप येत आहे. आतापासून एक-दोन महिन्यांत एक आर्थिक भूकंप येणार आहे,” असे गांधी म्हणाले.

Exit mobile version