सीबीएसईने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सीबीएसई CBSE पुनर्मूल्यांकन पोर्टलद्वारे १६,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते, त्याचवेळी या प्लॅटफॉर्मवर अनेक सायबर हल्ल्यांचे प्रयत्न झाले. त्याच वेळी, या प्लॅटफॉर्मवर कथितरित्या सायबर हल्ल्यांची मालिका सुरु झाली.
त्या अनुशंगाने सीबीएसईने जारी केलेल्या निवेदनानुसार, ताज्या घटनेत डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DoS) हल्ल्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे दोन मिनिटांत पोर्टलवर जवळपास १५ लाख हिट्स निर्माण झाले. सिस्टमने फाइल्समध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्याचे एक लाखांहून अधिक प्रयत्न देखील शोधले.
Update from our Cybersecurity Teams:
The CBSE revaluation portal is currently supporting over 8,000 concurrent users. As of 3:00 PM today, more than 16,000 students have successfully completed their submissions.
While thousands of students accessed the CBSE re-evaluation portal…
— CBSE HQ (@cbseindia29) June 2, 2026
सायबर हल्ल्यांनंतरही, पोर्टल कार्यरत राहिले आणि विद्यार्थ्यांच्या अर्जांवर प्रक्रिया करणे सुरूच ठेवले. त्याचबरोबर, हे पोर्टल सध्या एकाच वेळी ८,००० हून अधिक वापरकर्त्यांना हाताळण्यास सक्षम असल्याचे सीबीएसईने एक्सवरील पोस्टवर नमूद केले.
पुनर्मूल्यांकन आणि निकालानंतरच्या इतर सेवांसाठी अर्ज करण्यासाठी दिवसभरात हजारो विद्यार्थ्यांनी या प्लॅटफॉर्मचा वापर केला.
हा आकडा महत्त्वाचा ठरतो कारण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यापूर्वीच सूचित केले होते की, पात्र विद्यार्थ्यांपैकी २० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणार नाहीत.
त्या अंदाजानुसार, अर्जदारांची संख्या सुमारे ८०,००० राहण्याची अपेक्षा होती.
तथापि, पोर्टल सुरू झाल्याच्या पहिल्या ९-१० तासांतच १६,००० अर्ज दाखल झाले आहेत आणि अर्ज सादर करण्याच्या मुदतीत अजून तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्याने, अंतिम संख्या लक्षणीयरीत्या जास्त असू शकते.
सीबीएसईच्या संचालकांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायानुसार अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आणि अर्ज सादर होण्यापूर्वी सत्र संपण्याचा धोका कमी करण्यासाठी सत्राची वेळमर्यादा वाढवणे समाविष्ट आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तांत्रिक पथके चोवीस तास प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून आहेत आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांवर प्रतिसाद देत आहेत.
तसेच सीबीएसईने “विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय सेवा उपलब्ध व्हाव्यात हे सुनिश्चित करण्यासाठी आमचे पथक सतर्क आणि तत्पर असल्याचे सीबीएसईने एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केले.
निकालोत्तर सेवांमध्ये, ज्यात पुनर्मूल्यांकन प्रक्रियेचाही समावेश आहे, तांत्रिक अडचणी आणि विलंब होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी आणि मूल्यमापनकर्त्यांनी केल्यानंतर, सीबीएसई CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीची छाननी सुरू असतानाच ही घडामोड समोर आली आहे.
