Marathi e-Batmya

योगीजी “त्या” प्रकरणात आम्ही कठोर कारवाई केलीय तुम्हीही कराल

मुंबई: प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली. तसेच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातही अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी संबधित गुन्हेगारांच्या विरोधात कडक कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योगी आदीत्यनाथ यांना दिली.
या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्यारितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलदंशहर प्रकरणी देखील दोषींना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करत कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही केले.

Exit mobile version