Tag Archives: bjp

अनिल देशमुख यांचा सवाल, राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? २४ तासात दोन घटना घडल्या

पुणे जिल्ह्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय नराधमाने केलेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणे हे राज्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.या घटनांवरून राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही,असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यात भाजपा सरकार अपयशी फडणवीसांनी थापा मारण्यापेक्षा कृती करावी, महिला सुरक्षेवर भाजपा सरकार गंभीर नाही, महिला अत्याचार रोखण्यासाठी बनवलेला शक्ती कायदा मोदी सरकारकडे मंजूरीसाठी पडून..

पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत पण प्रत्येक घटनेनंतर कडक कारवाई करू व विरोधकांनी राजकारण करू नये …

Read More »

अहिल्यानगर- चंद्रपूरला जिल्हाधिकारी कार्यालय ५० कोटीच्या आत मात्र नागपूरात १०० कोटीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार पहिल्या अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हाचे राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्या नगरमध्ये नवे जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहिल्यानगर मात्र पूर्वीचे अहमदनगर येथे इमारतीची उभारणीही केली. त्यासाठी राज्य सरकारकडून ५० कोटी रूपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचधर्तीवर राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने उभारायचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, महिला आरक्षण उपकार नाही तर अधिकार देशातील ५० टक्के लोकसंख्येला मूर्ख समजू नका, डिलिमिटेशनच्या आड महिला आरक्षण अडवण्याचा भाजपाचा डाव - सुप्रिया श्रीनेत

महिला आरक्षणाचा पाया १९८५ साली मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमात स्व. राजीव गांधी यांनी घातला आणि यातूनच पुढे पंचायत राज प्रणाली आणली. ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू केले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. पुढे सोनियाजी गांधी यांनी महिला आरक्षणासाठी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांना पीएपीच्या सदनिकांसाठी का होईना हाऊसिंग स्टॉकचा पर्याय 'हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे दिले आदेश

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आगामी काळातील हाऊसिंग स्टॉकचा प्रश्न भेडसावू शकतो याचे भान ठेवून गृहनिर्माण आणि पुर्नविकासाची परवानगी देताना विकासकाकडून हाऊसिंग स्टॉक मागण्यात येत असे. त्याचा फायदा राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पबाधितांसाठीच अनेकदा होत असे. मात्र राज्यातून काँग्रेस आघाडीचे सरकार गेले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव प्रदेश काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये भांडवणे लावण्याचे कारस्थान सुरु आहे, आपण सर्वांनी मिळून हा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र दिनी दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस …

Read More »

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा विश्वास, ‘विकसित महाराष्ट्र-2047 कडे वेगवान वाटचाल १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प

स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर आता देश विकसित भारत २०४७ कडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन डॉलर्सच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा ‘१ ट्रिलियन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचा वाटा असेल. राज्य शासनाने तयार केलेले ‘विकसित महाराष्ट्र २०४७ हे व्हिजन डॉक्युमेंट राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवेल, असा विश्वास …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये नवा घोटाळा, भाजपाकडून ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार करतानाचा व्हिडीओ बाहेर तृणमूल काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर करत केला आरोप

४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये नवे राजकीय वादळ उठले आहे. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) एक व्हिडिओ शेअर करत गंभीर निवडणूक अनियमिततेचा आरोप केला असून भाजपा आणि निवडणूक आयोगावर संगनमताचा आरोप केला आहे. X वरील एका तीव्र शब्दांतील पोस्टमध्ये, टीएमसीने दावा केला आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणत्याही संबंधित पक्षाच्या हितधारकांच्या …

Read More »

रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, भाजपाची लोकाभिमुख कार्यशैली जनतेपर्यंत पोहोचवा प्रवक्ता कार्यशाळेत बोलताना केले मार्गदर्शन

भाजपा परिवाराच्या विचारधारेचा प्रभावी प्रसार तसेच लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्यशैली जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील प्रदेश प्रवक्ता आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुख यांच्या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?

काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच फारकाळ कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सहभागी करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात दिलेले अजून एक आश्वासन तेलंगणा सरकारने पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळ राज्य सरकारमध्ये …

Read More »