Marathi e-Batmya

पाण्यासाठी दिल्ली सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, हरियाणा, उत्तर प्रदेशला आदेश द्या

मागील काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरणात उष्म्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यातच दिल्लीला पाण्याचा भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच दिल्लीला पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. यापार्श्वभूमीवर शेजारील राज्य असलेल्या हरियाणाने दिल्लीला महिनाभरासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी दिल्लीतील आप सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती आज ३१ मे रोजी सूत्रांच्या हवाल्याने द हिंदू या संकेतस्थळाने दिले.

संकटग्रस्त राष्ट्रीय राजधानीला अधिक पाणीपुरवठा करण्यासाठी हरियाणाला निर्देश देण्यासाठी दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दिल्लीतील आप सरकारने सर्वोच्च न्यायालयाला याचिका केली असून उष्णतेच्या लाटेमुळे शहरातील पाण्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे शेजारच्या हरियाणाला एका महिन्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली.
दिल्लीची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी काम करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे शहर सरकारने म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपाने हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील सरकारांना राष्ट्रीय राजधानीला महिनाभर पाणी देण्यास सांगावे, असे सांगून राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचे सांगितले. राष्ट्रीय राजधानीला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, जलमंत्री आतिशी यांनी हरियाणावर दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडत नसल्याचा आरोप केला.

आप सरकारच्या विरोधात भाजपाच्या नियोजित निषेधाचा संदर्भ देत अरविंद केजरीवाल म्हणाले की “समस्या सुटणार नाहीत”. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की, यावेळी राजकारण करण्याऐवजी, आपण मिळून दिल्लीतील जनतेला दिलासा देऊ या,” असे आवाहनही यावेळी केले.

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, “भाजपाने आपल्या हरियाणा आणि यूपीच्या सरकारांशी चर्चा करून दिल्लीला महिनाभर पाणी दिले तर दिल्लीतील लोक भाजपाच्या या पावलाचे खूप कौतुक करतील. इतका प्रचंड उष्णता उन्हाळा कोणाच्याही नियंत्रणाबाहेर आहे. पण आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर. आम्ही लोकांना दिलासा देऊ शकतो, ” असेही स्पष्ट केले.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत अशा कडक उन्हात पाण्याची मागणी खूप वाढली आहे, शेजारील राज्यांतून दिल्लीला मिळणारे पाणीही कमी झाले आहे. म्हणजे मागणी खूप वाढली आणि पुरवठा कमी झाला. आपण सर्वांनी मिळून यावर तोडगा काढला पाहिजे,” असेही सांगितले.

१ जूनपर्यंत अंतरिम जामिनावर बाहेर असलेले अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, संपूर्ण देश अभूतपूर्व उष्मा अनुभवत आहे. त्यामुळे यावेळी देशभरात पाणी आणि विजेचे संकट आहे. मात्र, दिल्लीत वीज परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या वर्षी दिल्लीत विजेची सर्वाधिक मागणी ७४३८ मेगावॅट होती. त्या तुलनेत यंदा सर्वाधिक मागणी ८३०२ मेगावॅटवर पोहोचली आहे. पण असे असतानाही दिल्लीतील विजेची परिस्थिती नियंत्रणात आहे, इतर राज्यांप्रमाणे वीज कपात केली नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

https://x.com/ArvindKejriwal/status/1796395166892433490

Exit mobile version